शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तालुक्यातील फुल शेतीला ‘कोरोना’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : फुलझाडे उपटण्याची वेळ, तातडीने शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अलटून पलटून वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह येणाºया अवकाळी पावसामुळे पुर्वीच शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच देश लॉक डाऊन असल्याने फुलांची मागणीही मंदावली आहे. परिणामी, जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जीवाचे रान करून बहरविलेली फुल शेतीतील विविध प्रजातींची फुलांची झाडे उपटण्याची वेळ या हवालदील शेतकऱ्यांवर आली आहे.मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.तसेच गर्दी टाळण्यासाठी विविध धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, मंगल सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फुलांची मागणीच नगण्य आहे. तालुक्यातील संत भोजाजी महाराज देवस्थानासह अनेक मंदिरांना टाळे लागले आहेत. परिणामी, ऐन हंगामाच्या काळात तालुक्यातील फूल व्यापारी या फुलशेतींकडे फिरकायला तयार नाही. शिवाय विदर्भातील सर्वात मोठी नागपूर येथील फुल बाजारापेठ बंद आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. तालुक्यातील वडनेर नजीकच्या पिपरी येथील सुनील चरडे यांची शेती आहे. त्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देत यंदा फुलशेती करण्याचा निर्णय घेत तशी कृती केली. सध्या त्याची फुलशेती चांगली बहरली असली तरी बाजारपेठाच बंद असल्याने चांगलाच आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.५० हजारांचे नुकसानसुनील चरडे यांनी अर्ध्या एकरात फुलशेती तर उर्वरित शेतजमीनीवर इतर पिकाची लागवड केली. मध्यंतरी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे फुलशेती वगळता इतर पीक जमिनदोस्त झाले. पण फुलशेती कायम राहिली. यातून सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, कोरोनामुळे बाजारपेठाच बंद असल्याने शेतीवर झालेला खर्चही निघणे कठीन असल्याचे शेतकरी चरडे सांगतात. फुल उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी चरडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी