शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील फुल शेतीला ‘कोरोना’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : फुलझाडे उपटण्याची वेळ, तातडीने शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अलटून पलटून वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह येणाºया अवकाळी पावसामुळे पुर्वीच शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच देश लॉक डाऊन असल्याने फुलांची मागणीही मंदावली आहे. परिणामी, जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जीवाचे रान करून बहरविलेली फुल शेतीतील विविध प्रजातींची फुलांची झाडे उपटण्याची वेळ या हवालदील शेतकऱ्यांवर आली आहे.मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, कोरोनामुळे सध्या संपूर्ण देशच लॉक डाऊन आहे. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.तसेच गर्दी टाळण्यासाठी विविध धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, मंगल सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फुलांची मागणीच नगण्य आहे. तालुक्यातील संत भोजाजी महाराज देवस्थानासह अनेक मंदिरांना टाळे लागले आहेत. परिणामी, ऐन हंगामाच्या काळात तालुक्यातील फूल व्यापारी या फुलशेतींकडे फिरकायला तयार नाही. शिवाय विदर्भातील सर्वात मोठी नागपूर येथील फुल बाजारापेठ बंद आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. तालुक्यातील वडनेर नजीकच्या पिपरी येथील सुनील चरडे यांची शेती आहे. त्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देत यंदा फुलशेती करण्याचा निर्णय घेत तशी कृती केली. सध्या त्याची फुलशेती चांगली बहरली असली तरी बाजारपेठाच बंद असल्याने चांगलाच आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.५० हजारांचे नुकसानसुनील चरडे यांनी अर्ध्या एकरात फुलशेती तर उर्वरित शेतजमीनीवर इतर पिकाची लागवड केली. मध्यंतरी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे फुलशेती वगळता इतर पीक जमिनदोस्त झाले. पण फुलशेती कायम राहिली. यातून सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, कोरोनामुळे बाजारपेठाच बंद असल्याने शेतीवर झालेला खर्चही निघणे कठीन असल्याचे शेतकरी चरडे सांगतात. फुल उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी चरडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी