शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोरोनामुळे बिघडली ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 15:47 IST

Wardha News गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा  : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.

कोरोना या महाभयंकर विषाणूचा देशात शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असेत, तर घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेला गृहपाठ करण्यात व्यस्त राहत असे; परंतु कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद करण्यात आल्या व यावर्षीच्या सत्रात शाळा सुरू न झाल्यामुळे त्यांचा दिनक्रमच बदलल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी निव्वळ खेळण्यातच दंग राहत आहेत. मागील एक-दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली काही लहान मुले तर चक्क शाळेत शिकलेली अक्षर ओळख व इंग्रजी वर्णाक्षरेसुद्धा विसरली आहेत. पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षीच्या सत्रात शाळा बंदच राहील की काय? असा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. एकंदरीत कोरोनामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील हे अनिश्चित आहे. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात व खेळण्यात बेभान झाले आहेत, तर शिकलेला काही अभ्यासक्रम विसरले आहेत. अभ्यास करण्याबाबत त्यांना म्हटल्यास शाळा बंद आहे हे कारण सांगून, ते काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

अंबादास खवशी, पालक, किन्हाळा (जसापूर)

कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आकलन क्षमतेच्या बाहेर गेला असून, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाला येणाऱ्या काळात बरीच मेहनत घ्यावी लागेल. शाळा अजूनही बंद आहेत. पालक व शासनाच्या समन्वयातून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा करावा.

रवींद्र कोहळे, पालक, तळेगाव (शा.पं.)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र