शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कोरोनामुळे बिघडली ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 15:47 IST

Wardha News गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा  : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.

कोरोना या महाभयंकर विषाणूचा देशात शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असेत, तर घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेला गृहपाठ करण्यात व्यस्त राहत असे; परंतु कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद करण्यात आल्या व यावर्षीच्या सत्रात शाळा सुरू न झाल्यामुळे त्यांचा दिनक्रमच बदलल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी निव्वळ खेळण्यातच दंग राहत आहेत. मागील एक-दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली काही लहान मुले तर चक्क शाळेत शिकलेली अक्षर ओळख व इंग्रजी वर्णाक्षरेसुद्धा विसरली आहेत. पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षीच्या सत्रात शाळा बंदच राहील की काय? असा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. एकंदरीत कोरोनामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील हे अनिश्चित आहे. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात व खेळण्यात बेभान झाले आहेत, तर शिकलेला काही अभ्यासक्रम विसरले आहेत. अभ्यास करण्याबाबत त्यांना म्हटल्यास शाळा बंद आहे हे कारण सांगून, ते काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

अंबादास खवशी, पालक, किन्हाळा (जसापूर)

कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आकलन क्षमतेच्या बाहेर गेला असून, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाला येणाऱ्या काळात बरीच मेहनत घ्यावी लागेल. शाळा अजूनही बंद आहेत. पालक व शासनाच्या समन्वयातून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा करावा.

रवींद्र कोहळे, पालक, तळेगाव (शा.पं.)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र