शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कंत्राटदारांवर कर्जाचा डोंगर; शासनाने आवळलाय फास ! दोन वर्षांपासून देयक थकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:39 IST

जिल्ह्यात अडीचशे कोटींची प्रतीक्षा : कामे पूर्ण झाल्यावरही शासनाकडून देयक अदा न झाल्याने कंत्राटदार कर्जबाजारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून विकासकामांचा गाजावाजा करीत मोठ्या प्रमाणात कामांचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदारांनीही कर्जाऊ रक्कम घेऊन कामांच्या निविदा भरत कामे पूर्णत्वास नेली. कामाच्या निविदा भरण्यापासून ते कामे पूर्णत्वास नेईपर्यंत सर्वांचेच सोपस्कार पूर्ण केले. पण कामे पूर्ण झाल्यावरही शासनाकडून देयक अदा न झाल्याने कंत्राटदार आता कर्जबाजारी झाले असून, शासनाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे बोलले जात आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत कामे करूनही शासनाने दीड कोटींचे देयक दिले नसल्याने सांगली जिल्ह्यातील युवा कंत्राटदाराने आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आता जिल्ह्यातील कंत्राटदारांनी संताप व्यक्त करून आमचीही स्थिती त्याहून वेगळी नसल्याचे बोलन दाखविले आहे. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राज्य महामार्ग प्राधिकरण यासह विविध विभागांमार्फत विकासकामे करण्यात आली. कंत्राटदारांना उपजिविकेसाठी कामे पाहिजे असल्याने त्यांनीही उसनवारी तसेच कर्जाऊ रक्कम घेऊन कामे पूर्णत्वास नेली. परंतु आता दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला तरीही शासनाकडून देयकेच अदा केली नसल्याने कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट असून, तातडीने देयक अदा करण्याची गरज आहे. 

२६८.६६ कोटीचे देयक दोन वर्षांपासून थकीतजिल्ह्यातील कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली. पण शासनाकडून कामे पूर्ण झाल्यावरही देयके दिली नाही. जिल्ह्यातील कंत्राटदारांचे तब्बल २५७ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम दोन वर्षांपासून थकीत असल्याची माहिती आहे.

जलजीवनचे ४० कोटी रुपये मिळालेच नाहीतजिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ८३९ कामे हाती घेण्यात आली होती. यातील निम्मी कामे पूर्णत्वास आली असून, निम्मी कामे सुरू आहेत. जी कामे झाली, त्यापैकी तब्बल ४० कोटी रुपयांची देयके रखडली असून, निधी नसल्याने कामांचीही गती मंदावली आहे. आता कंत्राटदारांनी कामे करूनही देयके मिळाली नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

कोणत्या कामाचे किती देयक शासनाकडे अडलेजिल्हा मार्ग                              १३६ कोटीजिल्हा मार्ग पूल                        ४० कोटीराज्य मार्ग                                 ३० कोटीराज्य मार्ग पूल                          ५० लाखकेद्रीय मार्ग निधी राज्य मार्ग      ०६ कोटीकेद्रीय मार्ग जिल्हा मार्ग            १५ लक्ष३०५४ देखभाल दुरुस्ती            ०५ कोटी

"दोन वर्षांपासून अडीचशे कोटींची देयके रखडली आहे. शासनाने कधीही पूर्ण निधी दिला नाही. कंत्राटदार कर्जबाजारी झाला असून, आता उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एकाने आत्मदहनाचाही इशारा दिला आहे."- किशोर मिटकरी, जिल्हाध्यक्ष, कंत्रा.सं.

टॅग्स :wardha-acवर्धा