शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:16 IST

Wardha : जनमंच माजी राज्याध्यक्ष प्रमोद पांडे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : खासगी बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहे. त्यामुळे प्रतेक शेतकरी आपले सोयाबीन शासनाने विकत घ्यावे, अशी अपेक्षा करीत आहे. मात्र, शासकीय खरेदी कधी जागेचा अभाव, तर कधी हमालाची कमतरता या कारणाने बंद राहत आली. आता तर मागील अनेक दिवसांपासून बारदाण्याअभावी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांतील सोयाबीन खरेदी बंद आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शासनाने ज्या शेतकयांनी नोंदणी केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होत नाही, तोपर्यंत शासकीय खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी जनमंचाचे माजी राज्याध्यक्ष श्री. प्रमोद पांडे यांनी केली आहे.

२७ जानेवारी अंतिम मुदत तालुक्यातील काही शेतकरी आपला माल शासकीय केंद्रावर आणण्याचा खटाटोप करतात. मात्र, शासन विविध कारणांनी खरेदी तात्पुरती बंद ठेवते. शासन १५ दिवस खरेदी बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. आता तर गेल्या अनेक दिवसांपासून बारदाण्याअभावी खरेदी बंद आहे. शासकीय खरेदीची अंतिम मर्यादा २७ जानेवारी असल्याचे समजते.

खरेदीसाठी जाचक अटी

शेतीचा लागत खर्च वाढत असताना, खुला बाजारात शेत मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. व्यापारी हमी भावाच्या कमी भावात शेतमाल खरेदी करत आहे. अशा वेळी शासनाने हमी भावाचे संरक्षण देऊन शेतमाल खरेदी करणे गरजेचे असते व कायद्यानेही शासनास बंधनकारक आहे, पण याला शासन सकारात्मक घेण्यापेक्षा चालढकल धोरण स्वीकारते. आता राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू आहे, पण कमीतकमी माल कसा खरेदी होईल, यासाठी शासन अनेक अटी घालते.

मुदत वाढवून द्यावी खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. सोबतच अनेक शेतकऱ्यांना वेळेवर सोयाबीन सवगणी करण्यासाठी मजदुर मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यानी बाहर जिल्ह्यातून मजदुर आणले. त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना एखादी आठवडा मुदत वाढवून देण्याची आश्यकता असतांना सरकार मुदत वाढ करून उपकार केल्याचे दाखवून सहानुभूती मिळविते. मात्र, ही बाब शेतकऱ्यांवर आर्थिक अन्याय करणारी असून, सोयाबीन खरेदीची शासकीय केंद्र नोंदणी ज्या शेतकऱ्यांनी केली आहे, त्या खरेदी करेपर्यंत शासनाने खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जनमंच या सेवाभावी संघटनेने केली आहे.

टॅग्स :SoybeanसोयाबीनFarmerशेतकरीwardha-acवर्धा