शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

नोंदणीकृत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरू ठेवा; २७ जानेवारीपर्यंत खरेदी मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:16 IST

Wardha : जनमंच माजी राज्याध्यक्ष प्रमोद पांडे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : खासगी बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहे. त्यामुळे प्रतेक शेतकरी आपले सोयाबीन शासनाने विकत घ्यावे, अशी अपेक्षा करीत आहे. मात्र, शासकीय खरेदी कधी जागेचा अभाव, तर कधी हमालाची कमतरता या कारणाने बंद राहत आली. आता तर मागील अनेक दिवसांपासून बारदाण्याअभावी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांतील सोयाबीन खरेदी बंद आहे. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शासनाने ज्या शेतकयांनी नोंदणी केली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होत नाही, तोपर्यंत शासकीय खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी जनमंचाचे माजी राज्याध्यक्ष श्री. प्रमोद पांडे यांनी केली आहे.

२७ जानेवारी अंतिम मुदत तालुक्यातील काही शेतकरी आपला माल शासकीय केंद्रावर आणण्याचा खटाटोप करतात. मात्र, शासन विविध कारणांनी खरेदी तात्पुरती बंद ठेवते. शासन १५ दिवस खरेदी बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. आता तर गेल्या अनेक दिवसांपासून बारदाण्याअभावी खरेदी बंद आहे. शासकीय खरेदीची अंतिम मर्यादा २७ जानेवारी असल्याचे समजते.

खरेदीसाठी जाचक अटी

शेतीचा लागत खर्च वाढत असताना, खुला बाजारात शेत मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. व्यापारी हमी भावाच्या कमी भावात शेतमाल खरेदी करत आहे. अशा वेळी शासनाने हमी भावाचे संरक्षण देऊन शेतमाल खरेदी करणे गरजेचे असते व कायद्यानेही शासनास बंधनकारक आहे, पण याला शासन सकारात्मक घेण्यापेक्षा चालढकल धोरण स्वीकारते. आता राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू आहे, पण कमीतकमी माल कसा खरेदी होईल, यासाठी शासन अनेक अटी घालते.

मुदत वाढवून द्यावी खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. सोबतच अनेक शेतकऱ्यांना वेळेवर सोयाबीन सवगणी करण्यासाठी मजदुर मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यानी बाहर जिल्ह्यातून मजदुर आणले. त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना एखादी आठवडा मुदत वाढवून देण्याची आश्यकता असतांना सरकार मुदत वाढ करून उपकार केल्याचे दाखवून सहानुभूती मिळविते. मात्र, ही बाब शेतकऱ्यांवर आर्थिक अन्याय करणारी असून, सोयाबीन खरेदीची शासकीय केंद्र नोंदणी ज्या शेतकऱ्यांनी केली आहे, त्या खरेदी करेपर्यंत शासनाने खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जनमंच या सेवाभावी संघटनेने केली आहे.

टॅग्स :SoybeanसोयाबीनFarmerशेतकरीwardha-acवर्धा