शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

अल्लीपुरात ‘एमपी’ची दारू भरलेला कंटेनर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देवर्ध्यात चर्चेला आले उधाण : वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार का दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन काळात इतर जिल्हे ‘ड्राय’ असतानाच वर्धा हा दारूबंदी जिल्हा मात्र, दारूविक्रीसाठी ‘ग्रीनझोन’ ठरला. अल्लीपूर येथे एका राजकीय वलयात वावरणाऱ्या व्यक्तीकडे चक्क मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.थोर पुरुषांचा सहवास वर्धा जिल्ह्याला लाभला आहे. सेवाग्राम ही महात्मा गांधीजींची कर्मभूमी असल्याने वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे दारूबंदी झाली. पण, तरीदेखील याच जिल्ह्यात कोटी रूपयांच्या दारूची उलाढाल होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध गावांमध्ये विदेशी दारूचे पाट वाहताना दिसतात. त्यामुळे महापुरुषांच्या जिल्ह्याला दारूने ‘कंलक’ लावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. मद्यविक्रीही बंद होती. पण, वर्धा जिल्हा याला अपवाद ठरला.वर्धा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विदेशीसह गावठी दारू मद्यपींना सहजच उपलब्ध झाली.शौकिनांच्या खिशाचा अंदाज घेत वाट्टेल त्या दरान विदेशी दारू विकल्या गेली आणि अजूनही विकल्या जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात जिल्हा सीमा बंद असताना वर्ध्यात येणारी दारू येते तरी कुठून, हा प्रश्न सहज उपस्थित होतो. अशातच अल्लीपूर येथील तथाकथीत होलसेल दारूविक्रेत्याने मध्यप्रदेशातील दारूसाठा उतरविल्याची खमंग चर्चा आहे.अल्लीपूर येथूनच संपूर्ण जिह्यात दारूचा पुरवठा होतो. अल्लीपूर येथील एका व्यक्तीचा अनेक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवायाही झाल्या. तो व्यक्ती हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून दारूची खुलेआम विक्री करीत असल्याचे बोलल्या जात आहे.लॉकडाऊन असतानाही दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या हॉटेलमागील शेतात मध्यप्रदेश येथून आलेला दारूसाठा भरलेला कंटेनरच उतरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.मोठ्याप्रमाणात दारू उतरवून जिल्ह्यातील गावागावांत पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करून सत्यता पुढे आणण्याची गरज आहे.दारूविक्रेत्याने केले होते पलायनतत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारूविक्रेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. शहरातील अनेक दारूविक्रेत्यांनी दारूविक्रीचा व्यवसाय बंद करून पर्यायी व्यवसाय सुरू केला होता. त्याचदरम्यान अल्लीपूर येथील दारूविक्रेत्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. परंतु, आता पोलिसांचा धाक संपल्याचे बोलल्या जात आहे.अल्लीपुर येथे दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पण, मध्यप्रदेशातून कंटेनरने दारूसाठा उतरल्याची मला माहिती नाही. मी याबाबत संबंधित ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेते, जर दारूविक्र गावात सुरू असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल.तृप्ती जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवळी-पुलगाव.

टॅग्स :Socialसामाजिक