शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

दरदिवशी साडेपाच हजार युवकांकडून पहिल्यांदा सेवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात.

ठळक मुद्देजागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन; समाजातील सर्वच घटकांचा पुढाकार गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्युहातून युवकांना बाहेर काढून तरुणांना तंबाखू व निकोटिन वापरण्यापासून प्रतिबंधित करणे ही यावर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. देशात दरदिवशी ३ हजार ५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मृत्युमुखी पडत आहे. रविवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी चिंतित करणारी आहे.सलाम मुंबई फाऊंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. शासनही तंबाखूमुक्त शाळांचे ध्येय १०० टक्के साध्य करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून ८ राज्यातील १ लाख ३७ हजार २३ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. ५८५ सेवाभावी संस्थादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण ३१ हजार ७०७ शाळां तंबाखूमुक्त झालेल्या आहेत.युवावर्गाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि युवापिढीचे आरोग्य बाधित ठेवण्यासाठी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन २०२० ची मोहीम सलाम मुंबई फाऊंडेशन, शिक्षण विभाग संयुक्तरीत्या राबविणार आहे.३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी वचनबद्ध होऊन, आपल्या देशातील भावी पिढीला तंबाखूच्या चक्रव्युहातून बाहेर काढले पाहिले.आपल्या देशातील भावी पिढी सुजाण आणि सशक्त करण्यासाठी सर्व शाळा या तंबाखू मुक्त असायला हव्यात. युवक ही भारताची शक्ती आहे. आणि ही शक्ती सशक्त आणि तंबाखुमुक्त असायला हवी यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यायला हवा.आजघडीला संपूर्ण देश कोविड-१९ या महामारीने ग्रासलेला आहे. तंबाखू सेवनाने कोरोनाचा प्रसार अधिक होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एकत्र येत तंबाखू सेवन विरोधी मोहीम अधिक मजबूत करायला हवी. आपली शाळा, घर, गाव आणि परिसर तंबाखूमुक्त करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.-डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य विभाग.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी