शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

सिमेंट रस्ता बांधकामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:58 IST

आर्वी नाका ते धुनिवाले चौक सिमेंट रस्ता सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. सुरूवातीपासूनच रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी वेळावेळी निदर्शनास आणून दिले.

ठळक मुद्देरायुकाँचा आरोप : आर्वी नाका ते धुनिवाले मठ चौक येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका ते धुनिवाले चौक सिमेंट रस्ता सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. सुरूवातीपासूनच रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी वेळावेळी निदर्शनास आणून दिले. अधिकारी येतात गाडीच्या बंदकाचेतून थातूर माथूर पाहणी करतात; पण रस्ता उत्कृष्ठ दर्जाचा व्हावा याकडे काही गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे शासनाचे २६ कोटी व्यर्थ गेल्याची चर्चा आता सवत्र होवू लागली आहे. या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांना केली आहे.सदर काम मुंबई येथील जे.पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. याकरिता २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर बांधकाम ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, आॅगस्ट महिना होवूनही रस्त्याचे बांधकाम अद्याप शिल्लक आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे लोकार्पण व्हायचे आहे. त्यापूर्वीच जागोजागी मोठे ठिगळ लावणे सुरू आहेत. तर प्रत्येक २०० मीटर मध्ये मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याला पडलेले मोठाले तडे झाकल्या जावे म्हणून त्याला ठिगळ लावल्या जात आहेत. यावरून सदर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग यावरून चुप्पी साधत आ. डॉ. पंकज भोयर यांच्यासह कंत्राटदारासोबत मोठा कमीशनचा व्यवहार झाल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. या रस्त्यावर आमदाराचे सतत येणे-जाणे सुरू असते असे असूनही निकृष्ट रस्त्याचे बांधकाम त्यांना दिसत नाही का? असा सवाल नागरिक करीत आहेत. रस्ता मंजूर करतेवेळी आमदाराने मोठा गाजावाजा केला. शहराच्या सौदर्यींकरणात भर पडणार असल्याच्या जाहिराती त्यावेळी केल्या गेल्या. आता मात्र रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम झाले आहे. सर्वत्र नागरिकांची ओरड होते आहे. हे लक्षात आल्याने आणि प्रकरण अंगलट आल्याने आमदार आपली जबाबदारी झटकत आहेत.मध्यंतरी आमदाराने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कुठलेही आंदोलन आमदाराने केले नाही. नागरिकांच्या डोळ्यात शुद्ध डोळेझाक करण्याचा हा प्रकार असल्याचे सर्व शहरवासीयांच्या आता लक्षात आले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी ही आमदाराची असते. रस्ता मंजूर करण्याचे श्रेय जर आमदाराला लाटता येते तर रस्ता बांधकामाचखा दर्जा पाहण्याचे काम आमदाराचे नाही काय? असा प्रश्न सर्व नागरिक करू लागले आहेत. गतवर्षी रस्ताबांधकामाला सुरूवात झाली. तेव्हापासूनच कुठे मोठा तर कुठे अरूंद बांधण्यात आला. रस्त्याला पाणी योग्य पद्धतीने देण्यात आल्या नसल्याने क्युरिंग झाले नाही. परिणामी जागोजागी भेगा पडल्या आहेत. नाली बांधताना अशाच प्रकारच्या चूका झाल्यात असे सर्व असताना सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून आहे. या रस्त्याच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनातून रायुकाँचे राहुल घोडे, संदीप किटे, अर्चित निघडे, धीरज देशमुख, नयन खंगार, राहुल ढोक, स्वप्नील राऊत, अजित ठाकरे, मंगेश गावंडे, संकेत निस्ताणे, मोहन काळे, माधव झळके, निखिल इंगोले आदींनी केली आहे.