शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सतत हात-पाय दुखणे अन् पायात मुंग्या? तुम्हाला आहे या आजाराचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:59 IST

Wardha : ३० वर्षे वयोगटातील तरुणाईत सायलेंट किलरचा धोका जास्त

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हाता-पायांना मुंग्या येणे, हे अगदी सामान्य लक्षण मानले जाते. सतत एका अंगावर झोपल्याने किंवा हात अंगाखाली आल्याने देखील हात-पायांना मुंग्या येतात आणि काही वेळाने त्या कमी होतात. म्हणून अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु हाता-पायांना मुंग्या येण्याची इतर अनेक कारणे आहेत. यामध्ये 'व्हिटॅमिन ई', 'व्हिटॅमिन बी'ची कमी, मधुमेह यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने सतत हाता-पायांना मुंग्या येतात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉमुळे धोका असतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने या आजारांचा धोका

  • कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्त नसांमध्ये जमा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलला वैद्यकीय भाषेत सायलेंट किलरदेखील म्हटले जाते.
  • आजच्या घडीला कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक आजाराचा धोका वाढलेला आहे. वयाची ३५ ते ४० वर्षे ओलांडल्यानंतर आपल्या आरोग्याची तपासणी करणेही गरजेचे आहे. अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्यास काय खाऊ नये तळलेले व भाजलेले पदार्थ, जास्त प्रमाणात तूर, मलाईचे पदार्थ, लाल मांस, मिठाई व गोड पेय, जास्त मीठ, फायबरयुक्त पदार्थ, फॅट असलेले पदार्थ व प्रोटिनयुक्त पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये, असे डॉक्टरांचे सांगणे आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे काय? शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हात-पाय सुन्न पडतात. डोळ्याजवळ गाठ निर्माण होते; तसेच जिभेचा रंगही बदलतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरातील मेणासारखा असणारा हा पदार्थ शरीरातील रक्त गोठवतो. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सायलेंट किलर अटॅकचा धोका उदभवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हाता-पायांना नेहमी मुंग्या येणे हे स्वाभाविक असले तरी त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेवुन उपचार करणे आवश्यक आहे. 

"आजार होण्यापूर्वी काही लक्षणे जावतात. ते आपल्या ओळखता आले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलमुळे सायलेंट किलर अटॅकचा धोका असतो."- डॉ. अंकुश कावलकर, जनरल फिजिशियन, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाHealthआरोग्य