शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ज्ञानेश्वरी'चे कर्करोगाशी लढा देत 'सीमोल्लंघन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 07:00 IST

Wardha News Health Cancer तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने कर्करोगावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

ठळक मुद्देमाणुसकी धावून आल्याने आजारावर मातगुरुजणांमुळे पाचवीमध्ये मिळाला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: चवथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ज्ञानेश्वरी नामक चिमुकलीला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने गुरुजींनी पुढाकार घेत 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' समजून मदतीचे आवाहन केले. बघता-बघता माणुसकी धावून आल्याने तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने या आजारावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

आर्वी तालुक्याच्या कर्माबाद येथे राहणारी ज्ञानेश्वरी धर्मराज टुले ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चवथ्या वर्गात शिकत असतानाच गेल्यावर्षी तिला रक्ताच्या कर्करोगाने तिला ग्रासले. घरची परिस्थिती बेताची असताना तिच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. अक्षरश: ज्ञानेश्वरी मृत्यूच्या दाढेत उभी होती. तिच्यावर मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यासाठी पैशाची गरज होती. चिमुकलीला आजाराने ग्रासल्याचे कळताच कुटुंबीयांचे बळ हरविले होते. यातच उपचाराकरिता लागणारा खर्च कसा करायचा या विवंचनेत असतानाच शाळेतील शिक्षकांनी मोठे बळ दिले. त्यांनी ज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वांना मदतीने आवाहन केले. अल्पावधीत जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करुन २ लाख ४७ हजार रुपयांचा निधी उभारला. सोबतच समाजातील दानशुर मंडळी व विविध सामाजिक संघटनांनीही मदत केली. सर्वांचे सदिच्छा आणि प्रार्थना पाठीशी असल्याने ज्ञानेश्वरीने दहा महिन्यांनंतर आजारावर मात करुन मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. ज्ञानेश्वरी आज आपल्यात आहे, याचा सर्वांनाच आनंद झाला असून कुटुंबीयांनी सर्वांचेच आभार मानले आहे.गुरुजींची धडपड लाख मोलाचीज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षक उमेश दगडकर यांनी सुरुवातीपासून गावचे पोलीस पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे, केंद्रप्रमुख कोहचाडे यांंच्या सहकार्याने मदतनिधी उभारण्यासाठी धडपड केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटांशी निगडीत धर्मदाय संस्था तसेच सर्व शिक्षक यांच्या सहकायार्मुळे चिमुकली आपल्यामध्ये आहे. ती आता आजारातून बाहेर पडली असून तिला नुकताच कृषक कन्या विद्यालयामध्ये पाचवीत प्रवेशही मिळाला आहे.ज्ञानेश्वरीला या आजारातून बाहेर काढण्याकरिता सर्व शिक्षण विभाग तिच्या पाठीशी उभा झाला होता. शिक्षकांसह विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. उमेश दगडकर या शिक्षकाने पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. कोरोना लोकडाऊनच्या काळातील परिस्थिती कुटुंबातील व्यक्तींची परीक्षा बघणारी होती. आज सर्व संकटावर ज्ञानेश्वरीने विजय मिळविला आहे. तिच्या करिता प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग