शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

'ज्ञानेश्वरी'चे कर्करोगाशी लढा देत 'सीमोल्लंघन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 07:00 IST

Wardha News Health Cancer तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने कर्करोगावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

ठळक मुद्देमाणुसकी धावून आल्याने आजारावर मातगुरुजणांमुळे पाचवीमध्ये मिळाला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: चवथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ज्ञानेश्वरी नामक चिमुकलीला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने गुरुजींनी पुढाकार घेत 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' समजून मदतीचे आवाहन केले. बघता-बघता माणुसकी धावून आल्याने तब्बल दहा महिन्यांच्या लढ्यानंतर ज्ञानेश्वरीने या आजारावर मात केली असून ती आता सुखरुप घरी पोहोचली. इतकेच नाही तर गुरुजींच्या मार्गदर्शनात तिने पाचवीत प्रवेश मिळवित शैक्षणिक सीमोल्लंघनही केले आहे.

आर्वी तालुक्याच्या कर्माबाद येथे राहणारी ज्ञानेश्वरी धर्मराज टुले ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चवथ्या वर्गात शिकत असतानाच गेल्यावर्षी तिला रक्ताच्या कर्करोगाने तिला ग्रासले. घरची परिस्थिती बेताची असताना तिच्यावर उपचार करण्यासाठी आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. अक्षरश: ज्ञानेश्वरी मृत्यूच्या दाढेत उभी होती. तिच्यावर मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यासाठी पैशाची गरज होती. चिमुकलीला आजाराने ग्रासल्याचे कळताच कुटुंबीयांचे बळ हरविले होते. यातच उपचाराकरिता लागणारा खर्च कसा करायचा या विवंचनेत असतानाच शाळेतील शिक्षकांनी मोठे बळ दिले. त्यांनी ज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वांना मदतीने आवाहन केले. अल्पावधीत जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचा हात पुढे करुन २ लाख ४७ हजार रुपयांचा निधी उभारला. सोबतच समाजातील दानशुर मंडळी व विविध सामाजिक संघटनांनीही मदत केली. सर्वांचे सदिच्छा आणि प्रार्थना पाठीशी असल्याने ज्ञानेश्वरीने दहा महिन्यांनंतर आजारावर मात करुन मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. ज्ञानेश्वरी आज आपल्यात आहे, याचा सर्वांनाच आनंद झाला असून कुटुंबीयांनी सर्वांचेच आभार मानले आहे.गुरुजींची धडपड लाख मोलाचीज्ञानेश्वरीला या आजारातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षक उमेश दगडकर यांनी सुरुवातीपासून गावचे पोलीस पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे, केंद्रप्रमुख कोहचाडे यांंच्या सहकार्याने मदतनिधी उभारण्यासाठी धडपड केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटांशी निगडीत धर्मदाय संस्था तसेच सर्व शिक्षक यांच्या सहकायार्मुळे चिमुकली आपल्यामध्ये आहे. ती आता आजारातून बाहेर पडली असून तिला नुकताच कृषक कन्या विद्यालयामध्ये पाचवीत प्रवेशही मिळाला आहे.ज्ञानेश्वरीला या आजारातून बाहेर काढण्याकरिता सर्व शिक्षण विभाग तिच्या पाठीशी उभा झाला होता. शिक्षकांसह विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात दिला. उमेश दगडकर या शिक्षकाने पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. कोरोना लोकडाऊनच्या काळातील परिस्थिती कुटुंबातील व्यक्तींची परीक्षा बघणारी होती. आज सर्व संकटावर ज्ञानेश्वरीने विजय मिळविला आहे. तिच्या करिता प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग