शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

दृढ आत्मविश्वासाने समाज परिवर्तन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:30 AM

नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे.

ठळक मुद्देबाल विजयजी : देशाच्या विविध भागातून ३२ स्पर्धक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकाच ध्येयाने व एकत्रित प्रयत्नातून कार्य करणे आवश्यक आहे. त्याकरिता वैज्ञानिक दृष्टी, आध्यात्मिक वृत्ती व करूणशीलता जोपासली पाहिजे. साम्ययुगाच्या आधारावर सर्वोदयी समाजाची निर्मिती शक्य आहे. त्याकरिता आत्मविश्वासाची दृढता अत्यंत आवश्यक असून या दृढतेतूनच नवसमाजाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन पवनार आश्रमचे ज्येष्ठ गांधीवादी बाल विजय यांनी केले. गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षा मंडळाच्यावतीने आयोजित कल के लिए गांधीवादी पर्याय या विषयावर आयोजित ४५ व्या कमलनयन बजाज स्मृती आंतर विश्वविद्यालयीन परिसंवादात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षा मंडळ वर्धाचे सभापती संजय भार्गव सहसचिव, पुरुषोत्तमदास खेमुका, परीक्षक डॉ. अंजली पाटील, नागपूर, डॉ. सिबी जोसेफ, प्रा. लेखराम दानन्ना परिसंवादाचे समन्वयक प्रा. भरत माने उपस्थित होते.परिसंवादाची सुरुवात स्व. कमलनयन बजाज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत व गौरवगीताने झाली. याप्रसंगी बोलताना बाल विजयजी पुढे म्हणाले की याप्रकारचे परिसंवाद ज्ञानवृध्दी करिता अत्यंत आवश्यक ठरतात. तरुणांनी या विषयाला केवळ स्पर्धेपुरतेच मर्यादीत न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे.याप्रसंगी संजय भार्गव म्हणाले की, आज वातावरणातील बदल, गरिबी, हिंसा व शहरीकरण ही आमच्या पुढील आव्हाने आहेत. आजची भांडवलशाही अर्थव्यवस्था लोभाकडे झुकलेली आहे व ती अशीच राहिल्यास समाजावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन तो नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आज समाजात नवनिर्मितीची भावना, विश्वास व एकत्रीकरणाची नितांत गरज असून त्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे व त्या आधारेच आपण एका वास्तववादी व आशादायी समाजाची निर्मिती करू शकतो.याप्रसंगी परिसंवादाचे परीक्षक डॉ. अंजली पाटील, डॉ. सिबी जोसेफ व प्रा. लेखराम दानन्ना यांनी सुध्दा विचार व्यक्त केले. या अखिल भारतीय आंतर विश्वविद्यालयीन परिसंवादात देशाच्या विविध प्रांतातून आलेल्या एकूण ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांचे सूतमाला घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. एन. वाय. खंडाईत यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. भरत माने यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विजेत्या स्पर्धेकांचा झाला गौरवपरिसंवादाच्या हिंदी माध्यमातून प्रथम पुरस्कार रू. १५ हजार सोनल पटेरिया, भोपाळ, द्वितीय पुरस्कार रू. १० हजार मो. हाशीम, नवी दिल्ली व तृतीय पुरस्कार रू. ७ हजार ५०० संस्कृती चतुर्वेदी, वाराणशी यांना तर इंग्रजी माध्यमात प्रथम पुरस्कार रू. १५ हजार शुभम सुर्या, गांधीनगर, द्वितीय पुरस्कार रू. १० हजार अवंतिका शुक्ला, राजस्थान व तृतीय पुरस्कार रू. ७ हजार ५०० वैभव मेहता, पुणे यांना प्राप्त झाला.

टॅग्स :scienceविज्ञान