शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालव्यांची दुरवस्था

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती ओलिताखाली आणता यावी, उद्योगांनाही पाणी मिळावे या हेतूने निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ महत्प्रयासाने निम्न वर्धा प्रकल्प तर पूर्ण झाला;

वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती ओलिताखाली आणता यावी, उद्योगांनाही पाणी मिळावे या हेतूने निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ महत्प्रयासाने निम्न वर्धा प्रकल्प तर पूर्ण झाला; पण अद्यापही कालव्यांची कामे रेंगाळत सुरूच आहेत़ ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ याप्रमाणे ही कामे सुरू असून पूर्णत्वास येण्यापूर्वीच कालवे नादुरूस्त होत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागमा आहे़ आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली़ या प्रकल्पातून निघणारा मुख्य कालवा रोहणा, सोरटा, पुलगाव या गावांतून पुढे यवतमाळ जिल्ह्यातील गावांपर्यंत जोडण्यात आला आहे़ या कालव्याची कामे विविध कंपन्यांना देण्यात आली आहेत़ यात देवळी तालुक्यातील बहुतांश काम घेतलेली कंत्राटदार कंपनी योग्यरित्या बांधकाम करीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ पडेगाव येथे बांधकाम सुरू असतानाच कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते़ अद्यापही हा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही़ असे असताना पुलगाव शहरात अनेक ठिकाणी या कालव्यात सिमेंटीकरण झालेल्या भागात गवत व अन्य वनस्पती उगवल्याचे दिसते़ शिवाय अनेक ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे काम अर्धवटच करण्यात आलेले आहे़ यामुळे खोदकामही पुन्हा करावे लागत असल्याचे दिसून येत आहे़ कित्येक वर्षांपासून सुरू असलेले कालव्याचे काम अनेक दिवस निधीमुळे रेंगाळले तर अनेक ठिकाणी कंत्राटदार कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे रेंगाळल्याचे दिसते़ यामुळे शेतकऱ्यांचे ओलिताचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत सदर कंत्राटदार कंपनीला जाब विचारावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी, अशी मागणी होत आहे़ शिवाय कालव्याच्या बांधकामाचा दर्जा राखला जावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देत कालवा पूर्ण करून घेणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)