शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

धाडी गावात अस्वच्छतेचा कळस; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:50 AM

धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही.

नाल्या तुंबल्याने साचली गटारगंगा : ग्रामपंचायत विकास कामे सोडून राजकारणात दंग लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने गटारगंगा साचली आहे. ग्रामसेवक सुटीवर असून सरपंच विकास सोडून राजकाणात दंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. नाल्या तुंबल्यामुळे अळ्या तयार झाल्या आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार तोंड वर काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी उकिरडे साचले आहे. त्याखाली पाणी साचल्याने अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक विहिरीत ब्लीचिंग पावडर टाकले नाही. यामुळे गावातील नागरिकांना दूषित व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांनाही त्याच पाण्याची सवय करून घ्यावी लागत आहे. शौचालय बांधकाम अपूर्ण असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गावातील पथदिवे कित्येक वर्षांपासून पडलेले आहेत. गावातील नागरिक कराचा भरणा करीत असले तरी ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे त्यांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. आष्टी-साहूर मार्गावर धाडी गाव असल्याने येथे अधिकारी वारंवार भेटी देतात. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छता करीत नाही. पाटील यांच्या घरासमोर मोठे डबके साचले आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये घाण साचली आहे. वॉर्डातील नागरिक ओरडून थकले; पण कारवाई झाली नाही. मोठी ग्रामपंचायत असताना विकास कामांत माघारल्याचे दिसून येत आहे. गावातील सूमार दर्जाची कामे केविलवाणी अवस्था दर्शविणारी आहे. रस्त्यावरील उकिरडे साफ करून दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धाडी गावाला एकदा भेट द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.