शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हा सीमेवर शहरपक्षी नीलपंख करणार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : रेल्वेस्थानकावर बसविणार बापूंच्या आफ्रिका प्रवास रेल्वे डब्याची प्रतिकृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दक्षिण ऑफ्रिकेला जाताना पहिल्यांदा ज्या रेल्वे डब्यातून प्रवास केला होता, त्या रेल्वे डब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वेस्थानकावर तर वर्धेकरांच्या मतदानातून निवडलेला शहरपक्षी नीलपंख, याची भव्य प्रतिकृती जिल्ह्याच्या प्रेवश व्दारावर उभारली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुनील केंदार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरील विकासकामे झाली आहे. दुसऱ्या बाजुचेही कामे तात्काळ सुरू करावे.सेवाग्राम येथील चरखा घरच्या आवारात स्क्रॅपपासून बनविलेले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे भव्य शिल्प बसविण्यात येत आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचे सौदर्यीकरण करण्यात आले आहे. सौदर्यीकरण झालेल्या कामाचे स्वरूप तसेच कायम राहावे म्हणून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मोठ्या कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि मोठे शासकीय कार्यालये यांना सोपविण्यात यावी, अशी सूचनाही पालकमंत्री यांनी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री उपस्थित होते.शासकीय कार्यालयात चरखा लागणारसेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती इतर जिल्ह्यातून तसेच परदेशातून येणाºया नागरिकांना व्हावी, यासाठी नागपूर विमानतळ, नागपूर रेल्वेस्थानक, वर्धा रेल्वेस्थानक आणि वर्धा बसस्थानकावर ऐतिहासिक माहिती देणारे केंद्र उभारण्यात यावे.जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या शासकीय कार्यालयात चरख्याची प्रतिकृती बसविण्यात यावी. तसेच पवनार येथील धामनदीच्या पात्राची शोभा वाढविण्याकरीता पाण्याचे मोठे कारजेही उभारण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री सुनील केदार यांनी या आढावा बैठकीत दिल्यात. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ही विकास कामे गांधी जयंतीपूर्वी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता या कामांना गती येणार आहे.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीrailwayरेल्वे