सर्दी-खोकल्याच्या आजारांमुळे नागरिक बेजार
By Admin | Updated: January 12, 2015 22:58 IST2015-01-12T22:58:31+5:302015-01-12T22:58:31+5:30
आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहेत. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

सर्दी-खोकल्याच्या आजारांमुळे नागरिक बेजार
वर्धा : आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहेत. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तींच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व दिवसा काहीसा उकाडा अशा वातावरणामुळे साथीचे आजार बळावत आहेत.
वातावरणातील अचानक बदलामुळे विषाणुजन्य आजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधीच श्वासाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. थंडीमुळे कोरडी हवा श्वासोच्छवासामुळे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर जाणवतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचे संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाचा आजारही बळावतो. दम्याच्या रुग्णांना या वातावरणात अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जास्त वेळ उपाशी राहणे या काळात अपायकारक सिद्ध होते. त्यामुळे नियमित सकस आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर्स रुग्णांना देत आहेत. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खात थोडे थोडे चार, पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, राजे एक फळ किंवा सुखा मेवा खाणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर्स सांगत आहेत.
सर्दी, पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी रुग्णांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. वयोवृद्धांना अशा गारठ्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे लहान मुले आन्मि वृद्धांची जास्त काळजी घेने गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)