शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अल्पवयीन नववधूकरिता आली मंत्रालयातील पोलीस शिपायाची वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 10:55 IST

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. नववधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह (child marriage) रोखला.

ठळक मुद्देसमितीने रोखला बालविवाह समुद्रपूर तालुक्यातील घटनापोलिसात अद्याप तक्रार नाही

वर्धा : मुंबई येथील मंत्रालयात पोलीस शिपायी असलेला मुलगा समुद्रपूर तालुक्यातील एका गावात वरात घेऊन आला. पण, नववधू अल्पवयीन (Minor) असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने (child welfare committee wardha) घटनास्थळी जाऊन बालविवाह (child marriage) रोखला. परिणामी मोठ्या अपेक्षेने आलेल्या या मुंबईच्या नवरोबाला आल्या पावलीच माघारी जावे लागले.

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. हा विवाह २४ डिसेंबरला होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळताच बाल कल्याण कल्याण समितीने(CWC) गाव गाठून विवाह थांबविला. मुलगा, मुलगी, त्यांचे आईवडील व नातेवाईकाना समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आष्टीकर, अलका भुगूल, रेखा भोयर व इतर बालकल्याण समितीचे सदस्य आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, संरक्षण अधिकारी महेश कामडी, सामाजिक कार्यकर्ता मेघा तामगिरे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, सहायक पोलीस निरीक्षक मसराम, ग्रामसेवक दिनेश चांदेवर, सरपंच बलराम राऊत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थितीत ग्रामसेवकांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. पण, चार दिवसांचा कालावधी लोटला, तरीही ग्रामसेवकाने यासंदर्भात कोणतीही तक्रार दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नवरोबाच पोलीस खात्यात असल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील गावामध्ये होणार होता. मुलगी अल्पवयीन असल्याने हा बालविवाह रोखण्यात आला. त्यासंदर्भात बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी असलेले ग्रामसेवक यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काय झाले याची माहिती घेतली जाईल.

प्रशांत विधाते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

काय ते समितीनेच करावे : ग्रामसेवक

मुलीच्या जन्माचा दाखल कुणाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून ती कमी वयाची असल्याचा दाखल मागितला होता. पण, तो मला मिळाला नसल्याने मी तक्रार केली नाही. माझ्या माहितीप्रमाणे उद्या ती १८ वर्षाची होणार आहे, अशी माहिती आहे. मी या विवाह समारंभातही सहभागी नव्हतो. आता काय ते समितीनेच करावे, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी