शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ‘शो पीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:04 IST

ग्रामीण भाग शहरांशी जोडून विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्त्वाची आहे; पण ते वर्धा जिल्ह्यात ‘शो पीस’ ठरली आहे. लांब व महत्त्वाचे मार्ग सोडून कमी लांबीच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील प्रकार : नियोजनाअभावी गावे रस्त्यांपासून वंचित

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : ग्रामीण भाग शहरांशी जोडून विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्त्वाची आहे; पण ते वर्धा जिल्ह्यात ‘शो पीस’ ठरली आहे. लांब व महत्त्वाचे मार्ग सोडून कमी लांबीच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. शासनाने वेळीच दखल घेतल्यास ही योजना सकारात्मक ठरू शकते. अन्यथा इतर योजनांप्रमाणे ती गुंडाळण्याची वेळ येईल, असे चित्र आहे. यासाठीच अभ्यासू अधिकाºयांनी जिल्ह्याचा सर्व्हे करून पाठविला. यात अधिक लांबीच्या रस्त्यांना मंजुरी देण्याची शिफारस केलेली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास खात्याच्या अखत्यारित आहे. यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची यंत्रणा वापरली जाते. २०१६ -१७ मध्ये आठही तालुक्यांत रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. या कामांची माहिती घेतली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्यात. यात अधिक लांबीचे रस्ते मंजूर करण्याचे शासन आदेश असताना लोकप्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रात कमी लांबीचे मार्ग मंजूर केलेत. जिल्ह्यात अनेक रस्त्यांना मंजुरी आहे. ५० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांना यंदाही स्थान दिले गेले नाही.आष्टी तालुक्यात गोदावरी, टेकोडा, माणिकवाडा ते तारासावंगा, सालोरा ते द्रुगवाडा, विसापूर-येनाडा, कोल्हाकाळी, देवगाव ते आनंदवाडी, आष्टी ते किन्हाळा, अंबिकापूर-देलवाडी, जोलवाडी, आबाद, किन्ही मोई, सुसुंद्रा हे रस्ते समाविष्ट केले नाही. तत्पूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या वेटींग लीस्टमध्ये या रस्त्यांना प्राधान्य देत मार्गी लावण्याचे ठरले होते; पण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत त्यांना स्थान नाही. आर्वी तालुक्यात गव्हाणखेडी-कवाडी, तरोडा, बोथली, रोहणा, दिघी, सायखेडा, अहिरवाडा, वर्धमनेरी, जळगाव, परतोडा, माजरा, कासारखेडा, देवुरवाडा, सर्कसपूर, भादोड, सालदरा, रोहणा, मलातपूर, बोदड ते बोदड पोळ हे रस्ते यादीत नाहीत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हीच स्थिती आहे.शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत रस्त्यांसाठी भरघोस निधी दिला; पण नियोजन नसल्याने अनेक गावे रस्त्यांपासून वंचित आहेत. सद्यस्थितीत आष्टी तालुक्यात भिष्णूर व लिंगापूर या दोनच रस्त्यांचा निधी मंजूर असून कामे सुरू आहे. उर्वरित रस्ते कधी मंजूर होणार, हे अनुत्तरीत आहे. २०१७-१८ व १८-१९ च्या आराखड्यात वंचित रस्ते समाविष्ट करून कामे पूर्ण करून घेणे गरजेचे झाले आहे.प्रतिसाद न देणारे अधिकारीमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामासाठी वर्धा जिल्ह्यात कार्यकारी अभियंता म्हणून अब्दुल जावेद या अधिकाºयाची नेमणुक शासनाने केली आहे. सदर अभियंत्याचे कामाकडे लक्ष नसून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. या अधिकाऱ्यांकडून सततची अरेरावी आणि मनमानी पाहावयास मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्क्रीय अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कार्यालयीन वेळेत हे महाशय बहुतांश वेळा गायब असतात. मोबाईलवर संपर्क केला तर प्रतिसाद देत नाही.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अधिक लांबीच्या रस्त्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यकारी अभियंता जावेद यांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून कारवाई करू.- रमेश होतवाणी, अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नागपूर.