शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उगवण क्षमता तपासून सोयाबीन बियाण्यांची लागवड केल्यास फसवणुकीला लागेल ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता  आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सोयाबीन उत्पादकांना सल्ला : १.२३ लाख हेक्टरवर लागवडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उभ्या सोयाबीन पिकावर विपरित परिणाम झाले. यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी तयारी करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. त्यानंतरच सदर बियाण्यांची शेतात लागवड करावी. असे केल्यास यंदाच्या कोविड संकटात फसवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागेल, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केल्याचे बिल घेत सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्याचे लक्षात आल्यावरच त्या बियाण्याची लागवड करावी. उगवण क्षमता कमी असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने, बियाणे खरेदी केलेल्या देयकाची झेरॉक्स सलग्न करून थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळी दखल घेत बियाणे विक्रेता कंपनीवर कृषी विभागाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. 

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर थेट करता येणार लेखी तक्रारnउगवण क्षमता कमी असलेल्या बियाण्याबाबतची तक्रार शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर करता येणार आहे. तालुका कृषी अधिकारी ही तक्रार तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी वळती करणार आहे.

अधिकाऱ्यांच्या समक्ष तपासावी उगवण क्षमता- सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर शेतकऱ्यांनी सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. याप्रसंगी कृषी सहायक उपस्थित राहिल्यास योग्य पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासता येणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी करणार चैाकशीअंती जबाबदारी निश्चित- एखाद्या कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता अतिशय कमी असल्याचे लक्षात येताच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर करून दोषी बियाणे कंपनीवर जबाबदारी निश्चित करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

फसणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्यावरच सदर बियाण्याची लागवड करावी, तर उगवण क्षमता कमी असल्यास तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळीच दखल घेत कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :agricultureशेती