शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

बापूंच्या आश्रमावर राहणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली.

ठळक मुद्दे३२ कॅमेरे लावले : चष्मा चोरीनंतर सुरक्षेकडे विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली. बापू कुटी आणि कार्यालय या ठिकाणी साहित्य ठेवण्यात आलेले आहे. ते काचेच्या शोकेसमध्ये कुलूप बंद आहेत. बा व बापूचे साहित्य व वस्तू मौल्यवान आहे. पण आश्रमात गार्ड वा बंदुकधारी अशी व्यवस्था करता येत नाही कारण या बाबी आश्रमच्या परंपरेत बसत नाही. बापूंच्या कार्य काळापासून जसे आहेत तसेच ते ठेवण्यासाठी आश्रम कटीबद्ध आहे. पण घटना सांगून होत नाही. चष्मा चोरी प्रकरण झाले आणि साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गाजला. त्यावेळी नव्या आश्रमच्या कार्यकारणीने २०१३ मध्ये अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी या बाबत लक्ष घातले. सर्व व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. ही काळाची गरज लक्षात घेऊन यासाठी खा. रामदास तडस यांच्याकडे ही बाब मांडली. यावर लगेच त्यांनी होकार देत आश्रम कॅमेºयाच्या देखरेखीखाली आणण्याच्या कामासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. आता तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रमावर लक्ष ठेवून आहे. यात आश्रम परिसर, सर्व स्मारके,रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार,कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने सुरक्षा कवच मजबूत झाले आहे. आता आश्रमात येणाºया प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवता येणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे आश्रमातील दुर्मिळ वस्तूची चोरी होणार नाही.गोशाळा, आहार केंद्रही कॅमेºयाच्या रेंजमध्येसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गत यात्री निवास आणि आहार केंद्रात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे सर्व क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सुकर झाले आहे. आज तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रम व परिसरावर लक्ष ठेवून आहे.यात आश्रम परिसर, सर्व स्मारके, रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार, कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आश्रमाचे सुरक्षाकवच तगडे झाले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक