शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:52 IST

ग्रेडरची केली बदली : शेतकऱ्यांची होताहेत अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकणे नुकसानीचे ठरत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजार पेठ अंतर्गत येणाऱ्या येथील काही जिनिंगमध्ये शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाही आनंद झाला होता, मात्र हा आनंद औटघटकेचा ठरला. येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचे कारण पुढे करून ग्रेडर हर्षल शिंदे यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे.

यावर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच नापिकी झाली आहे. भरीसभर योग्य भावही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या सततच्या रेट्यामुळे शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली. मात्र त्याच्यातही खोडा घातला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या येथील कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी बारा भानगडी केल्या जात आहे. कापूस विक्रीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः कागदपत्रासह हजर राहण्याचा नियमही शेतकऱ्यांना त्रास देऊन गेला. 

खासगी कापूस संकलन केंद्रापेक्षा कापूस खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल इकडे होता मात्र, येथील अधिकाऱ्यांच्या भानगडी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरल्या सेलूच्या कापूस संकलन केंद्रावर कापसाची आवक कमी आहे, असे सांगत भारतीय कपास निगमच्या अकोला येथील महाप्रबंधकाने येथील ग्रेडरची बदली करून या ठिकाणचा प्रभार वायगाव व देवळी येथील केंद्र संचालक हिवसे यांच्याकडे दिला. ते सेलू येथे येतच नसल्याने सेलूतील सीसीआयच्या केंद्रावरील कापूस खरेदी गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी सुरू व्हावी यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

नाफेडच्या सोयाबीन खरेदीची गती मंदावली....नाफेडच्यावतीने खरेदी विक्रीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या सात- बारासह सोयाबीनची नोंदणी केली होती त्यांची सोयाबीन खरेदी सुरू असून त्याची गती संथ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी बाजार समितीत मिळेल त्या भावात सोयाबीन विकून मोकळे होत आहे.

"कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठ सेलू येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. सेलू तालुक्यात काळी जमीन व कपाशीला सिंचनाची व्यवस्था असल्याने कापूस सुरुवातीला कमी निघतो. त्यामुळे विक्रीसही कापूस कमी येतो. सीसीआयने कापूस विक्रीसाठी कमी येतो हे कारण पुढे करीत ग्रेडची बदली केली. त्यामुळे बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगार यांनी सीसीआयच्या महाप्रबंधकांशी फोनवर चर्चा करून ग्रेडर देण्याची मागणी केली. तसेच बाजार समितीने ११ डिसेंबरला महाप्रबंधकांना पत्रही दिले. कायमस्वरूपी ग्रेडर द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे." - महेंद्र भांडारकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी / सेलू

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरीfarmingशेती