शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:52 IST

ग्रेडरची केली बदली : शेतकऱ्यांची होताहेत अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकणे नुकसानीचे ठरत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजार पेठ अंतर्गत येणाऱ्या येथील काही जिनिंगमध्ये शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाही आनंद झाला होता, मात्र हा आनंद औटघटकेचा ठरला. येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचे कारण पुढे करून ग्रेडर हर्षल शिंदे यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे.

यावर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच नापिकी झाली आहे. भरीसभर योग्य भावही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या सततच्या रेट्यामुळे शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली. मात्र त्याच्यातही खोडा घातला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या येथील कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी बारा भानगडी केल्या जात आहे. कापूस विक्रीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः कागदपत्रासह हजर राहण्याचा नियमही शेतकऱ्यांना त्रास देऊन गेला. 

खासगी कापूस संकलन केंद्रापेक्षा कापूस खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल इकडे होता मात्र, येथील अधिकाऱ्यांच्या भानगडी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरल्या सेलूच्या कापूस संकलन केंद्रावर कापसाची आवक कमी आहे, असे सांगत भारतीय कपास निगमच्या अकोला येथील महाप्रबंधकाने येथील ग्रेडरची बदली करून या ठिकाणचा प्रभार वायगाव व देवळी येथील केंद्र संचालक हिवसे यांच्याकडे दिला. ते सेलू येथे येतच नसल्याने सेलूतील सीसीआयच्या केंद्रावरील कापूस खरेदी गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी सुरू व्हावी यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

नाफेडच्या सोयाबीन खरेदीची गती मंदावली....नाफेडच्यावतीने खरेदी विक्रीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या सात- बारासह सोयाबीनची नोंदणी केली होती त्यांची सोयाबीन खरेदी सुरू असून त्याची गती संथ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी बाजार समितीत मिळेल त्या भावात सोयाबीन विकून मोकळे होत आहे.

"कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठ सेलू येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. सेलू तालुक्यात काळी जमीन व कपाशीला सिंचनाची व्यवस्था असल्याने कापूस सुरुवातीला कमी निघतो. त्यामुळे विक्रीसही कापूस कमी येतो. सीसीआयने कापूस विक्रीसाठी कमी येतो हे कारण पुढे करीत ग्रेडची बदली केली. त्यामुळे बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगार यांनी सीसीआयच्या महाप्रबंधकांशी फोनवर चर्चा करून ग्रेडर देण्याची मागणी केली. तसेच बाजार समितीने ११ डिसेंबरला महाप्रबंधकांना पत्रही दिले. कायमस्वरूपी ग्रेडर द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे." - महेंद्र भांडारकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी / सेलू

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरीfarmingशेती