शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हुंड्यात मागितले १० लाख, मागणी पूर्ण न झाल्याने नवरदेवाने थांबविली वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 14:13 IST

वधू मंडळीची उडाली तारांबळ; नवरदेवासह नातलगांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : हुंडा घेणं हा गुन्हा असला तरी अद्यापही देशातील अनेक भागात तो घेतला जातो. गाडी, फ्लॅट, दागिने, पैसे अशा स्वरुपात भेटवस्तूंच्या नावाखाली मागणी केली जाते. हुंड्यापायी अनेक लग्न मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासातून सुनेचा प्रचंड छळ देखील केला आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली.

लग्नमंडपात आयत्या वेळी हुंड्यासाठी नवरदेव अडून बसला. १० लाखांची मागणी केली. मागणी पूर्ण न होताच वरात घेऊन येण्यास नकार दिला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात नवरदेवासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांनी दिली.

हिंगणघाट येथील तरुणीचे वरोरा येथील पुंडलिक वामन बावने याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न जुळले, घरात लग्नाची तयारी सुरू झाली. साखरपुड्याचाही कार्यक्रम आटोपला. २० ऑगस्टला वरोरा येथे लग्नाचा मुहूर्त ठरला. नववधूसह कुटुंब वरोरा येथे लग्नाला गेले; मात्र नवरदेवाने मुलाच्या उपचारासाठी १० लाखांची मागणी वधूपित्याकडे केली; पण वधूपित्याने ती मागणी पूर्ण न केल्याने नवरदेवाने वरातच थांबवून लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुंडलिक बावने, श्रीकृष्ण किसन बावने, मीराबाई श्रीकृष्ण बावने यांच्याविरुद्ध कलम ३,४ हुंडाबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वधू पक्षाकडील मंडळीला मोठा धक्का

लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती.लग्नपत्रिकाही छापून सर्वांकडे गेल्या होत्या. आचारी, डेकोरेशन, हॉल, मेहंदीवाले, सगळे बुक झाले होते; मात्र वेळेवर नवरदेव लग्नमंडपात न आल्याने वधू पक्षाकडील मंडळींना याचा मोठा धक्का बसला इतकेच नव्हे तर नववधू व तिच्या कुटुंबीयाची बदनामी झाली. आर्थिक नुकसानही त्यांना सोसावे लागले.

लग्नाच्या एक दिवसापूर्वी नवरदेवाचा फोन

ठरल्याप्रमाणे सासरच्या सर्व मागण्या नववधूच्या घरच्यांनी पूर्ण केल्या; मात्र लग्नाच्या एक दिवसापूर्वी नववधूच्या वडिलांच्या मोबाईलवर पुंडलिकने फोन करून उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर लग्न होणार नाही, असे सांगण्यात आले. वधू मंडळी नवरदेवाच्या घरी जात त्यांची समजूत काढली; मात्र १० लाख दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात वधूमंडळी वाट पाहत राहिली पण नवरदेव वरात घेऊन आलाच नाही.

आरोपीला आणण्यासाठी पथक जाणार

नववधूच्या वडिलांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार हुंडाबंदी कायद्यांतर्गत नवरदेवास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील पथक लवकरच वरोरा येथे रवाना होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडाmarriageलग्नwardha-acवर्धा