शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वीज वापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान; होऊ शकते अचानक तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 15:58 IST

वीज वापर शून्य ते ४० युनिट असलेल्या ग्राहकांवर सध्या महावितरणचा विशेष वॉच असून, भरारी पथकांकडून अचानक छापा टाकून मीटर तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देमीटरमध्ये छेडछाड आढळल्यास होऊ शकते दंडात्मकसह फौजदारी कारवाई

वर्धा : विजेचा जास्त वापर होऊनही विद्युत देयक कमी यावे यासाठी अनेक व्यक्ती विद्युत मीटरमध्ये छेडछाड करतात, पण वीज वापर शून्य ते ४० युनिट असलेल्या ग्राहकांवर सध्या महावितरणचा विशेष वॉच असून, भरारी पथकांकडून अचानक छापा टाकून मीटर तपासणी केली जात आहे. विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळताच या भरारी पथकातील अधिकाऱ्यांकडून दोषीवर दंडात्मकसह फौजदारी कारवाई केली जात आहे.

विद्युत चोरीच्या प्रकारामुळे महावितरणला मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महावितरण कंपनीकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी गोपनीय माहितीच्या आधारे विद्युत ग्राहकाच्या निवास्थानी, व्यावसायिक प्रतिष्ठान आदी ठिकाणी छापा टाकून सदर ठिकाणी विद्युत चोरी तर होत नाही ना याची शहानिशा करतात. विद्युत चोरी हा कायद्यान्वये गुन्हा आहे, हे विशेष.

दिवाळीआधीच ३,८२४ घरांत अंधार

विद्युत देयकांच्या थकबाकीचा आकडा ३१२.६२ कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे महावितरणकडून थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ८२४ ग्राहकांची विद्युतजोडणी खंडित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विद्युतचोरीचे प्रमाण नाममात्रच

विद्युतचोरी करणाऱ्यांवर महावितरणच्या भरारी पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाते. शिवाय विद्युत चोरी हा कायद्यान्वये गुन्हा असून, विद्युत चोरी करणाऱ्याला दंडात्मक व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते याबाबतची महावितरणकडून वेळोवेळी जनजागृती केली जात असल्याने जिल्ह्यात विद्युतचोरीचे प्रमाण नाममात्रच असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे वीजपुरवठ्याची निव्वळ थकबाकी ३१२.६२ कोटी रुपये आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात असून थकबाकीची रक्कम अदा न करणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. नागरिकांनीही आपल्याकडील विद्युत देयकाची थकबाकी वेळीच अदा करून महावितरणला सहकार्य करावे.

- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा

ग्राफ

जिल्ह्यातील वीजग्राहक

घरगुती : २,९८,४०५

वाणिज्य :१९,०३७

औद्योगिक : ४,३०३

कृषिपंप : ७५,४४७

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीelectricityवीजtheftचोरी