कालवे, पाटचऱ्या सोडून पाणी वाहते शेतात
By Admin | Updated: January 28, 2016 02:13 IST2016-01-28T02:13:40+5:302016-01-28T02:13:40+5:30
परिसरातील खरांगणा (गोडे) हमदापूर, पुढे वायगाव, भोसा आदी गावापर्यंत महाकाली आणि बोर धरणाचे पाणी कालवे, ...

कालवे, पाटचऱ्या सोडून पाणी वाहते शेतात
सेवाग्राम : परिसरातील खरांगणा (गोडे) हमदापूर, पुढे वायगाव, भोसा आदी गावापर्यंत महाकाली आणि बोर धरणाचे पाणी कालवे, उपकालवे आणि पाटचऱ्यांच्या माध्यमातून शेतात पोहचले आहे. परंतु सदर पाणी कालवे सोडून वाट मिळेल तिकडे वाहता आसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
महाकाळी आणि बोर प्रकल्पामुळे सेवाग्राम ते हमदापूर पुढे वायगाव, भोसा आदी गावात सिंचनाला बळकटी मिळाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही पिके घेणे सोपे झाले आहे. परंतु कुटकी फाटा ते हमदापूर या दरम्यान शिवनगर आणि हमदापूर परिसरात पाणी कालवे व पाटसऱ्यां सोदून शेतात व रस्त्यावर वाहात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे कालवे, उपकालवे आणि पाटचऱ्यांची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल घेत वाया जाणारे पाणी व त्यातून होत असलेले पिकांचे नुकसान थांबविण्याची मागणी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वारंवार करीत आहेत.(वार्ताहर)