शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

ब्रिटीशकालीन कारागृह दीडशे वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:52 IST

ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.वर्धा जिल्हा कारागृहाची स्थापना ब्रिटीशांच्या राजवटीत सन १८६७ मध्ये झाली होती. त्यावेळी कारागृहाला वर्ग ३ चा दर्जा देण्यात आला होता; परंतु, सन १९९४ मध्ये या कारागृहाला वर्ग १ चा दर्जा देण्यात आला. सदर कारागृहाची बंदी क्षमता २५२ असून सध्यास्थितीत तेथे नऊ महिलांसह एकूण ३४३ कैदी आहेत. महिला बंदी कारागृहात दाखल झाल्यावर त्यांचे अ‍ॅडमिशन करून महिला विभागात महिला कर्मचारी व महिला तुरुंग अधिकारी याच्या उपस्थितीत अंग झडती घेण्यात येते. त्याच वेळी त्याची मेडीकल हिस्टी जाणून घेत गंभीर आजार असल्यास त्याची नोंद घेतली जाते. इतकेच नव्हे तर महिला बंदींच्या मासिक पाळीची तारीख विचारून त्यांना सॅनिटरी नॅपकीन पुरविल्या जाते. तसेच त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून ज्यांची कुवत वकील करण्याची नाही त्यांना शासनातर्फे वकील पुरविण्याची व्यवस्था करून दिली जाते. उत्कृष्ट भोजन, बंदीवानांच्या माहितीत भर टाकण्यासाठी विविध विषयांची पुस्तके या कारागृहात बंदीवानांसाठी आहेत.सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बंदीवानांकडून दररोज योग व व्यायाम करून घेतल्या जातो. महिला बंदीवानांना सामाजिक संघटनांच्या मदतीने स्वयंरोजगारा संबंधिचे प्रशिक्षणही दिले जात असून यात शिवणकाम, ब्युटी पार्लर, रांगोळी रेखाटणे, मेहंदी रेखाटणे आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्नच केला जातो.सुरक्षेच्या दृष्टीने दारूगोळाही पुरेसाचसदर कारागृहात अधिकारी व कर्मचारी असे ५१ मनुष्यबळ मंजूर आहे. त्यापैकी सध्यास्थितीत तुरुंगाधिकारी श्रेणी २ हे एक पद रिक्त असून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या कारागृहात पुरेसा दारूगोळा व शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचे समजते.सुमारे चार हेक्टर शेतीयेथील कारागृहाचे एकूण क्षेत्रफळ ६ हेक्टर ४३ आर असून त्यापैकी ३ हेक्टर ९४ आर जमिनीवर बंदीवानांकडून शेती करून घेतली जाते. तर २ हेक्टर ४९ हेक्टर जमीन कारागृह परिसर क्षेत्र म्हणून असल्याचे सांगण्यात आले.विनोबांसह १७ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा कारावासस्वातंत्र्य लढ्याच्या काळात इंग्रजांनी याच कारागृहात आचार्य विनोबा भावे, शिवराज चुडीवाले, गोपालराव काळे, किशोरीलाल मश्रुवाला, काका कालेलकर, प्रोफेसर भनसाली, श्रीकृष्णदास जाजू, राधाकृष्ण बजाज, कृष्णदास गांधी, आर्य नायकम, तेजराम राघवदास, सदाशिव गंद्रे, आशादेवी आर्यनायकम, डॉ. मुजुमदार, देवचंद्र रामचंद्र, जानकीदेवी बजाज, जे. सी. कुमारप्पा यांनी कारावास भोगला आहे.

टॅग्स :jailतुरुंग