शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

यशोदा नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला.

ठळक मुद्देदेवळी-नांदोरा मार्ग बंद : पोलिसांनी धोका टाळण्यासाठी लावले कठडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे यशोदा नदीवरील पूल खचला. त्यामुळे देवळी-नांदोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच सतर्कतेचा एक भाग म्हणून देवळी पोलिसांनी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावला आहे.गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला. हा पूल अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असून नादुरूस्त आहे. पुलाच्या कडाही तुटल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.सदर बाब बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पुलाचे जुने बांधकाम दुर्लक्षित ठरले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. डिगडोह नदीवरील पुलाचे एक बाजू पूर्णत: खरडून गेली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.नाल्यावरील रपट्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.बोरी मार्गावरील पूल खचलाबोरधरण - बोरी येथील गावाजवळील पूल पुरामुळे खचला. अर्धाअधिक पूल खचल्याने या मार्गाने चार चाकी वाहन जाणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच पूल पार करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर दुरूस्तीचे काम हाती घेणार काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी होईनाआंजी (मोठी) - येथून ४ किमी अंतरावर असलेल्या खैरी येथील ग्रामस्थांच्या अडचणीत सध्या चांगलीच भर पडली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मागील चार दिवसांपासून या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे कुठलेही साहित्य खरेदी करण्यासाठी या गावातील नागरिकांना आंजी (मोठी) येथे यावे लागते.सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ६०० लोकसंख्या असणारे खैरी हे गाव आहे. या गावाचा प्रत्येक कामासाठी आंजी (मोठी) या गावाशी संपर्क पडतो. वर्धा-आर्वी मार्गावरून या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यावर धाम नदी वरून पूल आहे. परंतु, तो छोटा असल्याने आणि त्याची उंचीही कमी असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.मागील चार दिवसांपासून याच पुलावरून सतत पुराचे पाणी वाहत आहे. शिवाय वाहणाºया पाण्याला चांगलाच प्रवाह असल्याने या पुलावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही जण जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गत २० वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी या गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिसroad transportरस्ते वाहतूक