शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला.

ठळक मुद्देदेवळी-नांदोरा मार्ग बंद : पोलिसांनी धोका टाळण्यासाठी लावले कठडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे यशोदा नदीवरील पूल खचला. त्यामुळे देवळी-नांदोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच सतर्कतेचा एक भाग म्हणून देवळी पोलिसांनी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावला आहे.गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला. हा पूल अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असून नादुरूस्त आहे. पुलाच्या कडाही तुटल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.सदर बाब बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पुलाचे जुने बांधकाम दुर्लक्षित ठरले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. डिगडोह नदीवरील पुलाचे एक बाजू पूर्णत: खरडून गेली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.नाल्यावरील रपट्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.बोरी मार्गावरील पूल खचलाबोरधरण - बोरी येथील गावाजवळील पूल पुरामुळे खचला. अर्धाअधिक पूल खचल्याने या मार्गाने चार चाकी वाहन जाणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच पूल पार करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर दुरूस्तीचे काम हाती घेणार काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी होईनाआंजी (मोठी) - येथून ४ किमी अंतरावर असलेल्या खैरी येथील ग्रामस्थांच्या अडचणीत सध्या चांगलीच भर पडली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मागील चार दिवसांपासून या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे कुठलेही साहित्य खरेदी करण्यासाठी या गावातील नागरिकांना आंजी (मोठी) येथे यावे लागते.सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ६०० लोकसंख्या असणारे खैरी हे गाव आहे. या गावाचा प्रत्येक कामासाठी आंजी (मोठी) या गावाशी संपर्क पडतो. वर्धा-आर्वी मार्गावरून या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यावर धाम नदी वरून पूल आहे. परंतु, तो छोटा असल्याने आणि त्याची उंचीही कमी असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.मागील चार दिवसांपासून याच पुलावरून सतत पुराचे पाणी वाहत आहे. शिवाय वाहणाºया पाण्याला चांगलाच प्रवाह असल्याने या पुलावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही जण जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गत २० वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी या गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिसroad transportरस्ते वाहतूक