शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जलपर्णीमुळे कोंडलाय तलावाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:48 IST

शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

ठळक मुद्देसमुद्रपूरच्या गाव तलावाचे अस्तित्वच धोक्यात : जीवनदायिनी ठरलेल्या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असतानाही नगरपंचायतीला मात्र तलावाच्या पुनर्जीवनाच्या कामाचा विसर पडल्याचा आरोप होत आहे.शहरातील बाजार समितीच्या मागच्या बाजूस असलेल्या या गाव तलावाची निर्मिती जवळपास पन्नास वर्षापूर्वी जनपत सभेच्या कालखंंडात झाली आहे. तब्बल दहा ते बारा एकर जागेत हा तलाव विस्तारलेला आहे. आठवडी बाजारात बैल व गुराच्या खरेदी-विक्रीकरिता येणाऱ्या बाजारकरु आणि गुरांची तहाण याच तलावातून भागविली जात होती. आता हाच गाव तलाव दुर्लक्षितपणाचा बळी पडत आहे. मागील तीन दशकापासून बेशरमच्या झुडपांनी वेढलेला आहे. तसेच या तलावाचा गाळही उपसला नसल्याने तो पुर्णत: बुजलेला आहे. तसेच तलाव्या पाळी जमीनदोस्त झाल्याने या तलावाचे सौदर्यही धोक्यात आले असून हा तलाव शहरासाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. तलावाचे महत्व लक्षात घेऊन मागील अनेक वर्षापासून या तलावाला पुनर्जीवीत करण्याचे प्रस्ताव प्रशासन दरबारी घेण्यात आले. मात्र गेल्या पन्नास वर्षाच्या काळात एकदाही या तलावाची स्वच्छता करुन गाळ उपसण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. या तलावात ३० वर्षापूर्वी मत्स्य व्यवसाय करून भोयी समाज स्वत: चा उदरनिर्वाह करीत होते.पण, या वीस वर्षाच्या काळात या तलावात पाण्याचा थेंबही दिसत नाही. यामुळे गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी गावातील महिला या तलावाच्या पाण्याचा वापर कपडे धुण्याकरिता करीत होत्या. तलावात पाणी साचत असल्याने गावातील घरगुती आणि सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी टिकून राहत होती.पण मागील काही वर्षात गावातील विहिरींनी तळ गाठले आहे. तलावात गाळ साचून झाडे-झुडुपांनीही वेढा दिल्याने या तलावाचा श्वास कोंडला आहे. या तलावात पाणी साठविले जात नसल्याने गावातील पाण्याची पातळी खालावत आहे. गावातील सामाजिक कार्य करणाºया मंडळींनी बरेचदा या तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी ग्रामप्रशासनाकडे मागणी केली आहे. परतु ती मागणीही ग्रामप्रशासनाच्या दप्तरी कित्येक वर्षापासून खितपत पडलेली आहे. गावासाठी महत्वाचा असलेल्या तलावाचे खोलीकरण व स्व्च्छता केली तर गावातील पाण्याची पातळी वाढून गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल व काहींना रोजगारही मिळेल.राजकीय कलहामुळे आलेला निधी गेला परतमागील २ वर्षापूर्वी ग्रामपंचायतीकडे तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता निधी उपलब्ध झाला होता.पण राजकीय कलहामुळे हा निधी परत गेला. त्यामुळे या तलावाचा श्वास कोंडलेलाच आहे. नगरपंचायतीत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने या तलावाच्या पुनर्जीवितेसाठी पदाधिकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्याकडून तलावाचा गाळ काढून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.तलाव पुनर्जिवीत करण्याचे काम नगर पंचायतीच्यावतीने प्रस्तापित आहे. मात्र या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. या संदर्भात आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला आहे.निधी मिळण्याची संभावना आहे.सदर कामासाठी २ कोटी निधीची गरज आहे. अनुलोम सामाजिक संस्थेच्या वतीने तलावाचे खोलिकरण व गाळ उपसण्याचे काम प्रस्तावित काम आहे.- स्वालिहा मालगावे, प्रशासकीय अधिकारी, नगर पंचायत, समुद्रपूर.गाव तलाव खोलिकरणाचा मुद्दा सभागृहात कित्येकदा मांडला. सत्ताधाºयांनी गांभीर्याने घेतले नाही .त्यामुळे ‘गाळमुक्त तळ व शिवारयुक्त तळ’ या कार्यक्रमा अंतर्गत अनुलोम संस्थेच्या पदाधिकाºयांना भेटून योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. सदर काम प्रस्तावित आहे.- आशिष अंड्रस्कर, नगरसेवक.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण