शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महामार्गामुळे बोर नदीपात्र होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:44 IST

जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.

ठळक मुद्देशासनस्तरावर हालचालींना वेग : तीन तालुक्यांना लाभ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या नदीचे रूपडे पालटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यांतून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्याने ७७३ शेतकरी गडगंज झाले आहेत. यापैकी ७३५ शेतकऱ्यांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला मिळाला आहे. याकरिता या तिन्ही तालुक्यांतून ४९८.८१ हेक्टर शेती संपादित करण्यात आली आहे. या परिसरातील शेतींना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे दिवस पालटले आहे. शेतकºयांनी शेतीचा पैसा शेतीतच गुंतवल्याचे दिसून येत आहे. आता सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकरिता महत्त्वाची ठरणाºया तसेच १६ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या बोरनदीचाही कायापालट करणे आवश्यक आहे. या नदीपात्राची अद्याप स्वच्छता झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि जलपर्णींनी वेढा घातला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी या नदीपात्रातील गाळ वापरण्यात यावा, जेणेकरून नदीचेही पात्र खोल आणि स्वच्छ होईल, या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हाधिकाºयांना पत्र दिल्यानंतर त्यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाकडे अहवाल मागितला होता. या दोन्ही विभागाने गाळ काढण्याकरिता सहमती दर्शविली असून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग