शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली.

ठळक मुद्देकारवाई शून्य : सावंगी (मेघे) च्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच्या संच मान्यतेनुसार शाळांना शिक्षकांची पदे मंजूर केली जाते. त्यामुळे शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या सहायक शिक्षकासह मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी तब्बल ४१ विद्यार्थी बोगस दाखविले. त्यामुळे पटसंख्या नसतानाही हे दोन्ही पदे कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सुरु घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेत या शाळेतील पटसंख्या १४५ वर पोहोचली.या पटसंख्येनुसार शाळेतील कोणतेही शिक्षक अतिरिक्त ठरले नाही. मात्र संचमान्यतेनंतर लगेचच या ४१ विद्यार्थ्यांना दाखले देऊन कमीही करण्यात आले. पण, यासंदर्भात शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. या बोगस विद्यार्थ्यांना दाखले दिल्यानंतर शाळेती पटसंख्या केवळ १०४ वर आली आहे. याच बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे मुख्याध्यापक व सहायक शिक्षक नियमानुसार अतिरिक्त असतानाही वर्षभरापासून शासनाचे वेतन घेत आहे. याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाला असूनही शिक्षण विभागाने डोळे मिटल्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.वर्षिक तपासणीत झाला होता खुलासासावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष खिराळे यांनी ३ एप्रिल २०१८ रोजी वार्षिक तपासणी केली होती. यावेळी त्यांनी वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत सर्व वर्गाची तपासणी केली असता या शाळेतील उपस्थित पटसंख्या आणि शिक्षकांची मंजुरपदे याबाबत तफावत दिसून आली होती. इतकेच नाही तर संचमान्यतेपूर्वी वाढविलेले ४१ विद्यार्थी नंतर कमी झाल्याचे दिसून आले. पण, ते विद्यार्थी कोणत्या शाळेत गेले याची माहिती मुख्याध्यापकांना व शिक्षकांना नव्हती. असेही त्यावेळी तयार केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले होते. मात्र, वर्ष लोटूनही शिक्षण विभागाकडून कारवाई केली गेली नाही. यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Schoolशाळाfraudधोकेबाजी