शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

जि.प. मध्ये भाजपने राखला सामाजिक सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

२०१७ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यापूर्वी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतरण झाले. त्यामुळे काँग्रेसच्या एक गट भाजपच्या खेम्यात गेल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या चित्रा रणनवरे अध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या.

ठळक मुद्देखासदारांच्या पुढाकारातून रणनीती यशस्वी : सर्वांनाच खूश करण्याचा झाला प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जि.प.च्या इतिहासात यावेळी पहिल्यांदा विविध जाती-जमातीचा सामाजिक सलोखा जोपासण्यात भाजपला यश आल्याचे पदवाटपातून दिसून आले आहे.२०१७ मध्ये वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली. त्यापूर्वी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतरण झाले. त्यामुळे काँग्रेसच्या एक गट भाजपच्या खेम्यात गेल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या चित्रा रणनवरे अध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या जि.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यामुळे अध्यक्षपदी नितीन मडावी यांची वर्णी लागली. मात्र, २०१९ मध्ये राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे आता जि.प.मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतीपद देताना भाजपला विविध गोष्टींचा विचार करावा लागला. यावेळी पहिल्यांदा जिल्ह्यात भोयर-पवार समाजाला अध्यक्षपद देण्यात आले. कारंजा तालुक्यात हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या समाजाचा विचार पदासाठी भाजपने केला. याशिवाय आर्यवैंश्य (कोमटी) समाजाची संख्या वर्धा जिल्ह्यात नगन्य असली तरी राजकीयदृष्ट्या प्रगत असलेल्या या समाजाला उपाध्यक्षपद देण्यात आले. गेल्या तीन निवडणुकांमध्ये निवडून येणारे रिपाईचे ज्येष्ठ नेते विजय आगलावे यांना भाजपने आपल्या कोट्यातून सभापतीपद देवून जिल्ह्यातील दलित समाजालाही योग्य प्रतिनिधीत्व दिले. विजय आगलावे हे या सभागृहाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, ही भूमिका खा. रामदास तडस यांनी प्रकर्षाने मांडली. वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात कुणबी समाजाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. मात्र, या समाजातील विविध पोटजातीचा विचार करण्यात येत नव्हता. यावेळी राजकीयदृष्ट्या सत्तेपासून दूर असलेल्या वांढेकर कुणबी समाजाचाही पदवाटपात योग्य विचार करण्यात आला. तसेच तेली समाजालाही एक सभापतीपद देण्यात आले. एकूणच जातीय समीकरणाचा संपूर्ण समतोल भाजपने या सत्तावाटपाच्या कार्यक्रमात साधला. अनेकांची नाराजी यासाठी ओढावून घ्यावी लागली असली तरी भाजपच्या खासदारांसह तीनही आमदारांनी त्याची पर्वा केली नाही. आदिवासी समाजालाही सभापतीपदामध्ये प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी वर्धेच्या आमदारांनी घेतली. त्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माजी मंत्र्याच्याही शब्दाला त्यांनी किंमत दिली नाही, असे भाजपच्या राजकीय वर्तूळात सांगितले जात आहे. मात्र, एकूणच राजकीय पदवाटपात जिल्हा परिषदेत सामाजिक समतोल पूर्णपणे यशस्वी करण्यात भाजपला यश आले, हे तितकेच खरे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBJPभाजपा