शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विदर्भात कमी मताधिक्याच्या विजयाने भाजपला मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 17:56 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपला केवळ ३७ मतांनी विजय मिळाला. या कमी मताधिक्क्याच्या विजयाने भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देअर्थकारणात भाजप पिछाडीवरकाँग्रेस उमेदवारांची नियोजनात सरशी

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपला केवळ ३७ मतांनी विजय मिळाला. या कमी मताधिक्क्याच्या विजयाने भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचा एकहाती विजय होईल अशी अपेक्षा असताना काँग्रेसच्या उमेदवाराने कमी संसाधनाच्या बळावर गाठलेला मतांचा टप्पा अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. एकट्या वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यात ३०६ मतदार होते. त्यामध्ये भाजपकडे १८२ काँग्रेसकडे ६६ कडे, राकाँकडे २०, बसपाकडे १० शिवसेनेकडे ४ अपक्ष २४ असे संख्याबळ होते. या संख्याबळाच्या भरोशावर भाजपची मदार होती. परंतु भाजपने संघटनेतील कार्यकर्ता म्हणून डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप स्वतच्या मतासह ६०० मतापर्यंत मजल मारेल असे नेते सांगत होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे कुठलेही नियोजन या निवडणुकीत दिसले नाही. मतदारांना बाहेरगावी फिरण्यासाठी नेतांनाही प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जी बस पोहोचली तिला २४ तासापेक्षा जास्त अवधी लागला. तसेच ज्यांच्याकडे जिल्ह्याच्या नियोजनाची जबाबदारी होती. त्यांनी ३० रूम बुक केल्या असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात सात ते नऊच रूम तेथे बुकींग असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथेही भाजप मतदारांना त्रास सहन करावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूकीत सर्वात महत्त्वाचे असलेले अर्थकारण भाजपकडून फारच उशिरा करण्यात आले. त्यातही सर्र्वांच्या समक्ष आपल्या मतदारांची रांग लावून त्यांना पॉकीट सुपूर्द करण्यात आले. असा अपमानास्पद सारा प्रसंग मतदारांना अनुभवावा लागला. त्यामुळे मतदारांना आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविषयी प्रचंड चिड निर्माण झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी या निवडणूकीत उमेदवाराला व पक्षालाही आसमान दाखवून दिले. दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांनी आपले नियोजन व्यवस्थित केले होते. मात्र चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांच्यावर आमदार विजय वडेट्टीवार गटाचे उमेदवार असा ठप्पा लागला. त्यामुळे वडेट्टीवार विरोधक एकत्रित आले. त्यांनी सराफ विजयी झाले तर वडेट्टीवारांचे वर्चस्व वाढेल याभितीपोती सराफांपासून अंतर राखून ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली. कुठल्याही परिस्थितीत सराफ विजयी होऊ नये अशी भूमिका स्विकारल्याने या दोन जिल्ह्यात काँग्रेसचेही बरेच मतदान फुटले. शिवसेना भाजपसोबत कुठेही नव्हती. त्यामुळे त्यांचे काही मतं भाजपाला काही काँग्रेसलाही गेलेत राजकीय नेते मानतात. एकूणच या संपूर्ण निवडणूकीत काँग्रेस, भाजप, राकाँ व शिवसेना या चारही पक्षात मतांची फाटाफुट होऊन ही लढाई निर्यायक टप्प्यावर संपली. व भाजपला निसटता विजय मिळाला. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे वर्धा जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तेली समाजाला प्रतिनिधीत्व दिले जात आहे. असा जाहीर प्रचार करण्यात आला. त्यामुळे तेली समाज या निवडणूकीत एकवटला. हा दावा भाजपचे खासदार रामदास तडसही नाकारत नाही. याचाही फायदा भाजपला तिनही जिल्ह्यात झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांसाठी या निवडणूकीने अनेक गोष्टी आता गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचा संदेश दिला आहे. यातून भाजप नेतृत्व धडा घेईल अशी अपेक्षा व्यर्थ ठरू नये.

टॅग्स :Electionनिवडणूक