शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल.

ठळक मुद्देआर्वी कृउबासकडून दिलासा । दररोज १ हजार क्विंटल शेतमालाची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आर्वी येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात झाली असून दररोज ९०० ते एक हजार क्विंटल शेतमालाची आवक बाजार समितीत सुरू आहे. अडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागणार आहे. शेतकºयांना बाजार समितीच्या अडत्यांकडे आपल्या मालाची नोंद करणे बंधनकारक असून नोंदणीनंतर टोकन संबंधीत शेतकऱ्यास देऊन त्यांचा माल खरेदी करणार आहे.आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल. सकाळी ११ वाजता शेतमालाचा लिलाव करण्यात येतो व दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व माल भरून लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. सध्या तूर ५४०० तर चण्याला ३८०० रुपये क्विंटल भाव शेतकºयांना देण्यात येत आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब व गरजूंना बाजार समितीच्यावतीने जेवण देण्यात येत आहे. शुक्रवारी बाजार समिती परिसरात विषाणू बाधीत औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आर्वी बाजार समितीचे सभापती महादेव भाकरे, दिलीप भुसारी यांच्यासह बाजार समितीचे सर्व कर्मचारी सहकार्य करीत आहे.आठवड्यातून दोनदा होणार निर्जंतुकीकरण फवारणीआर्वी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाने आठवड्यातून दोन दिवस बाजार समिती परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.आर्वी बाजार समितीत अडत्यामार्फत शेतकºयांना टोकन देऊन शेतमाल खरेदी करणे सुरू झाले आहे. दररोज ९०० ते १००० क्विंटल शेतमालाची आवक सुरू आहे. शेतकºयांनी अडत्यांशी संपर्क करून शेतमालाची नोंदणी करून घ्यावी.विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृउबास, आर्वी

टॅग्स :Farmerशेतकरी