शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

सेलू येथील बारभाई गणेश मंडळाचे यंदा १२० व्या वर्षांत पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:00 AM

सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नामकरण बारभाई गणेश मंडळ असे केले.

ठळक मुद्देएकोप्याचा देतात संदेश : लोकमान्य टिळकांनी केली होती स्थापना, दहा दिवस राहणार कार्यक्रमांची रेलचेल

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : गावागावात एकोपा आणि सर्वधर्म समभाव असावा, याकरिता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यांनी स्वत: सेलूला येऊन १८९९ मध्ये सुरु केलेल्या या बारभाई गणेशोत्सवाने १२० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही तेवढ्याच धार्मिकतेने आणि एकोप्याने हा उत्सव अविरत सुरु आहे. या दहा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन गावात उल्हासपूर्ण वातावरणाची निर्मिती केली जाते.सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नामकरण बारभाई गणेश मंडळ असे केले. या मंडळात त्यावेळी गणपतराव जोशी, आबाजी वऱ्हाडपांडे, रामदेव जाजोदिया, नथमल राठी, रामविलास सराफ, श्रीचंद्रजी बेदमोहता, दीपचंद चौधरी, गजानन उपाध्ये, हिरालाल राठी, बोदरकर महाराज यांचा सहभाग होता. सेलू गावात हे एकमेव गणेश मंडळ असून ‘एक गाव एक गणपती’ म्हणून पोलीस विभाग गौरव करतात. दहाही दिवस येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. दररोज लंगरचीही व्यवस्था केली जाते. सेलुचे मुर्तीकार पुरूषोत्तम वालदे श्रध्दापूर्वक मूर्ती साकारुन मंडळाला देतात. दरवर्षी मूर्तीचा आकार व ठेवण जवळपास सारखीच असते. जुन्या पिढीकडून आता नव्या पिढीकडे हा उत्सव सुरू ठेवण्याची आलेली जबाबदारी सर्वजण गणेशाची कृपा म्हणून श्रध्दा पूर्वक पार पाडत आहे. दरवर्षी गणेशोत्सव मंडळाची निवड केली जाते. यावर्षीच्या मंडळात अध्यक्ष म्हणून नरेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष अक्षय बेदमोहता, कोषाध्यक्ष यश दफ्तरी व शैलेंद्र दफ्तरी तर सदस्य म्हणून पवन राठी, सुरेंद्र सराफ, ब्रिजमोहन मिश्रा, त्रिशुल चौधरी, सुरेंद्र भंडारी, प्रशांत बेदमोहता, आशिष लोलीया, संजय सराफ, संजय जोशी, दिलीप सारस्वत, राजेश पंचारिया, अमिन दप्तरी यांची निवड करण्यात आली.मूर्ती देण्याकरिता असतात स्पर्धालोकमान्य टिळकांच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला सेलुकरांनी चांगलीच साथ दिली आहे. दरवर्षी एकच गणपती बसवून त्यांची मनोभावे पूजाअर्चा करतात. बारभाई गणेश मंडळाला दरवर्षी मूर्ती देणारे दानदाते तयारच असतात. यासाठी दानदात्यांची स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे पुढील दहा वर्षांच्या मूर्तीचे आतापासूनच बुकींग झाले आहे. यावर्षी यंदा पुनम व महेश चांडक (खामगाव) यांच्याकडून श्रींची मूर्ती देण्यात आली आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019