शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

लग्नसराई हुकल्याने बांगडी व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:23 IST

Wardha news सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता, तर दुसरीकडे कोरोनाची भीती, या दुहेरी संकटात ते सापडले आहेत.

लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्याअर्थाने लग्न सोहळ्याची सुरुवात होते;पण दोन वर्षांपासून लग्न समारंभासारखे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत, मोजक्या नातेवाईकांत पार पाडण्याचे शासन आदेश आहेत. पण बाकी रितीरिवाजाला, डामडौलाला फाटा दिल्याने त्यांच्या पोटावर पाय आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून, ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही.

ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटले तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.

बांगडी व्यवसाय कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हॅन्डग्लोज वापरून करता येणे शक्य नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व ते जगू शकतील.

शेख अशफाक, बांगडी व्यावसायिक, समुद्रपूर

परडी-टोपल्या व्यावसायिक अडचणीत

 उन्हाळ्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या टोपली, परडी, सूप या वस्तूंना मागणी वाढत असते. लग्नसराईत या टोपल्या तसेच सुपाला विशेष महत्त्व असते. परंतु लाॅकडाऊनमुळे हे व्यावसायिक मोडकळीस आले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी बनवलेले पदार्थ या बांबूपासून बनविलेल्या परड्यावर सुकवायला घालायची प्रथा आहे. तसेच शेतमाल काढल्यानंतर शेवटी शिल्लक असलेला मातीमिश्रित शेतमाल या टोपल्याद्वारे ओला करून साफ केला जातो, जेणेकरून यांच्या बनावटीमुळे माती गाळली जाते व शेतमाल शिल्लक राहतो, परिणामी त्याचे पैसेही शेतकऱ्याला मिळतात. परंतु उन्हाळ्यात डोक्यावरून या वस्तू विक्रीसाठी फिरणारे आता मात्र दिसेनासे झाले आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस