शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

लग्नसराई हुकल्याने बांगडी व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:23 IST

Wardha news सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता, तर दुसरीकडे कोरोनाची भीती, या दुहेरी संकटात ते सापडले आहेत.

लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्याअर्थाने लग्न सोहळ्याची सुरुवात होते;पण दोन वर्षांपासून लग्न समारंभासारखे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत, मोजक्या नातेवाईकांत पार पाडण्याचे शासन आदेश आहेत. पण बाकी रितीरिवाजाला, डामडौलाला फाटा दिल्याने त्यांच्या पोटावर पाय आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून, ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही.

ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटले तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.

बांगडी व्यवसाय कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हॅन्डग्लोज वापरून करता येणे शक्य नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व ते जगू शकतील.

शेख अशफाक, बांगडी व्यावसायिक, समुद्रपूर

परडी-टोपल्या व्यावसायिक अडचणीत

 उन्हाळ्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या टोपली, परडी, सूप या वस्तूंना मागणी वाढत असते. लग्नसराईत या टोपल्या तसेच सुपाला विशेष महत्त्व असते. परंतु लाॅकडाऊनमुळे हे व्यावसायिक मोडकळीस आले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी बनवलेले पदार्थ या बांबूपासून बनविलेल्या परड्यावर सुकवायला घालायची प्रथा आहे. तसेच शेतमाल काढल्यानंतर शेवटी शिल्लक असलेला मातीमिश्रित शेतमाल या टोपल्याद्वारे ओला करून साफ केला जातो, जेणेकरून यांच्या बनावटीमुळे माती गाळली जाते व शेतमाल शिल्लक राहतो, परिणामी त्याचे पैसेही शेतकऱ्याला मिळतात. परंतु उन्हाळ्यात डोक्यावरून या वस्तू विक्रीसाठी फिरणारे आता मात्र दिसेनासे झाले आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस