शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

लग्नसराई हुकल्याने बांगडी व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:23 IST

Wardha news सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, बांगडी भरणारा कासार सध्या आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता, तर दुसरीकडे कोरोनाची भीती, या दुहेरी संकटात ते सापडले आहेत.

लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्याअर्थाने लग्न सोहळ्याची सुरुवात होते;पण दोन वर्षांपासून लग्न समारंभासारखे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत, मोजक्या नातेवाईकांत पार पाडण्याचे शासन आदेश आहेत. पण बाकी रितीरिवाजाला, डामडौलाला फाटा दिल्याने त्यांच्या पोटावर पाय आला आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून, ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही.

ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटले तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.

बांगडी व्यवसाय कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हॅन्डग्लोज वापरून करता येणे शक्य नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व ते जगू शकतील.

शेख अशफाक, बांगडी व्यावसायिक, समुद्रपूर

परडी-टोपल्या व्यावसायिक अडचणीत

 उन्हाळ्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या टोपली, परडी, सूप या वस्तूंना मागणी वाढत असते. लग्नसराईत या टोपल्या तसेच सुपाला विशेष महत्त्व असते. परंतु लाॅकडाऊनमुळे हे व्यावसायिक मोडकळीस आले आहेत. उन्हाळ्यात वर्षभरासाठी बनवलेले पदार्थ या बांबूपासून बनविलेल्या परड्यावर सुकवायला घालायची प्रथा आहे. तसेच शेतमाल काढल्यानंतर शेवटी शिल्लक असलेला मातीमिश्रित शेतमाल या टोपल्याद्वारे ओला करून साफ केला जातो, जेणेकरून यांच्या बनावटीमुळे माती गाळली जाते व शेतमाल शिल्लक राहतो, परिणामी त्याचे पैसेही शेतकऱ्याला मिळतात. परंतु उन्हाळ्यात डोक्यावरून या वस्तू विक्रीसाठी फिरणारे आता मात्र दिसेनासे झाले आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस