शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : जिल्ह्यात ७३.२३ मि.मी.पावसाची नोंद, नदी-नाल्यांना आला पूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतीपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू होती. काही भागात सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जगण्याचा आधार दिला जात होता. अशातच बुधवारी रात्रीपासून वरुणाची कृपादृष्टी झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काहीसा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. सेलू तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने जयपूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातील नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणी निर्माण झाली होती. 

सिंदी-दहेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प- सिंदी (रेल्वे): बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजतापासून सुरु झालेल्या पावसामुळे सिंदी-दहेगाव मार्गावरील पिपरा गावातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती. थोडाही पाऊस आला तरी या नाल्याला पूर येत असल्याने नांगरिकांसह शेतकऱ्यांना दरवर्षीच पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. येथील नारिकांनी अनेकदा या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी आमदार, खासदारांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने समस्या कायम आहे. आतातरी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.

सेवाग्रामातील मेडिकल चौक झाला जलयम- सेवाग्राम: बुधवारी सायंकाळपासून परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकत होते. या पावसामुळे शेतशिवारातील विहीर, नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीतही भर पडली आहे. तसेच या पावसामुळे मेडीकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसातून वाहन काढताना ते आडवे होत होते. या साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांच्या अंगावर चिखल उडाल्याने संतापही व्यक्त होत होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने पुढे काय? असा प्रश्न दिनेश पवार व दिलीप शेंद्रे आदी नागरिकांनी व्यक्त केला. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे केली जात असून अद्यापही ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. मेडीकल चौकातील नालीचे काम आणि रस्त्याचे काम रेंगाळले असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे या चौकात तलाव साचला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी