शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वनविभागाच्या विरोधात बैलबंडी मोर्चा

By admin | Updated: May 15, 2016 01:43 IST

वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांवर होत असलेल्या अतिरेकी कारवाईच्या विरोधात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : अतिरेकी कारवायांचा विरोध, बंड्याही केल्या जातात जप्तदेवळी : वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांवर होत असलेल्या अतिरेकी कारवाईच्या विरोधात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. सत्तारूढ पक्षाचे असल्याची तमा न बाळगता खासदार रामदास तडस यांनीही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार तेजस्विनी जाधव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शरद करे यांना देण्यात आले.मोर्चात देवळी व परिसरातील शेतकरी आपल्या बैलबंड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध असो, शेतकऱ्यांवर लादलेले खटले मागे घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा आदी मागण्यांचा जयघोष करीत शहराच्या मुख्य मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. मिरणनाथ मंदिर प्रांगणातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना व रोष पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होतो. कॉग्रेसच्या तालमीत वाढलेल्या वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनाचा खेळखंडोबा लावला आहे. वन्यजीव प्राण्यांबाबत पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना कारागृहात डांबले जात आहे, असे मत खा. तडस यांनी बैलबंडी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केले.जंगल परिसरातील नीलगाय, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रकरणी शेतकऱ्यांना दोषी ठरविले जात आहे. त्यांना अटक करून कारागृहात डांबले जात आहे. हा सर्व प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांवर लादलेले खटले मागे घेण्यात यावे. जप्त केलेल्या बैलबंड्या परत करण्यात याव्या, आदी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा खा. तडस यांनी पुनरूच्चार केला. आठ दिवसांत या मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शेती करावी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली असताना गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले जातात. शिवाय वन विभागाच्या हद्दीत आढळल्यासही कारवाई केली जाते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वन विभागाकडून गुन्हे दाखल करून खटले भरले जात असल्याने शेतकऱ्यांनी शेती करायची की कोट-कचेरीच्या चकरा मारायच्या, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यात शेतकऱ्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो.याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एसडीओ स्मीता पाटील, तहसीलदार तेजस्विनी जाधव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शरद करे यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात न.प. सभापती विलास जोशी, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, न.प. सदस्य कृष्णकांत शेंडे, दिलीप कारोटकर, तालुका शिवसेनाप्रमुख महेश जोशी, अब्दुल नईम, गिरीश काशीकर यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी बंदोबस्त ठेवला. मोर्चाला शरद आदमने, उदय काशीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, विजय बिजवार, वसंत ठाकरे, किसना कामडी, संजय ढोबळे व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)खा. तडस यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक करे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला टोलवाटोलवीचे उत्तरे दिली. जप्त केलेली बैलबंडी सोडण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. न्यायालयाचा आदेश आणल्यानंतरच पूढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यांच्या या अरेरावीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.