शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:22 AM

सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली.

ठळक मुद्देनुकसानीचे सत्र २० वर्षांपासून सुरूच : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : एम. आय. डी. सी. ला पाणीपुरवठा करण्यासाठी धाम नदीवर पवनारला बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्याचे बॅक वाटरमुळे निंबाळकर या शेतकºयाच्या दोन एकर क्षेत्राला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात पाणीच पाणी असल्याने उभ्या पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.सदर बंधारा हा वीस वर्षापूर्वीचा आहे. तेव्हा पासून या शेतकऱ्याचे वडील निव्वळ अज्ञानामुळे नुकसान सहन करीत होते. मुलाने शेती हाती घेतल्यानंतर सात-बारा वर असलेले क्षेत्र उपलब्ध क्षेत्रामध्ये खुप मोठी तफावर दिसून आली. तेव्हा मोजणी केली असता जवळपास ३ एकर क्षेत्र कुठलाही मोबदला न देता आधीच घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या संदर्भात त्यांनी उपअभियंता म.औ.वि.म प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म, नागपूर यांचेकडे वारंवार तक्रार दाखल केली. परंतु, विभागाने कुठलाही सर्व्हे केला नाही. शिवाय तक्रारीची साधी दखल घेतली नाही. त्या सोबतच उरलेल्या दोन एकर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरने नुकसान होत आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडल्या जात असल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीला विभागीय कार्यालयाकडे पाठविले आहे. सदर प्रश्न हा भूमिअभिलेखकडे येतो. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. या प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी मात्र सांगता येणार नाही.- गोपाल सोनसरे, विभागीय व्यवस्थापक, एमआयडीसी, नागपूर.आमची ही वडिलापार्जीत शेती आहे. वडिलांच्या काळापासून येथे नेहमीच नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसान टळावे या उद्देशाने संबंधितांना तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देऊन अडचणीत भर टाकली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, जिल्हाधिकारी योग्य न्याय करतील असा मला विश्वास आहे. कारण ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.- सुनील निंबाळकर, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती