शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चालणार वृक्षांवर कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यात आले. यावेळीही दुतर्फा असलेल्या विविध प्रजातीच्या शेकडोवर झाडांची कत्तल करण्यात आली.

ठळक मुद्देगोपुरी चौक-दत्तपूर टी पॉर्इंट मार्ग : नव्याने केल्यात खाचा, प्रशासनाकडून कत्तलीची पूर्वतयारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकीकडे वृक्षलागवडीचा गाजावाजा आणि दुसरीकडे डेरेदार वृक्षांची तोड, असा उफराटा प्रकार सुरू झाला आहे. गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर नव्याने क्रमांक टाकण्यात आले असून वृक्षकटाईच्या खाचाही नव्याने दिसून येत असल्याने पुन्हा वृक्षांवर कुऱ्हाड चालणार असल्याचे संकेत मिळत आहे. या महामार्गावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना ही कशाची पूर्वतयारी? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यात आले. यावेळीही दुतर्फा असलेल्या विविध प्रजातीच्या शेकडोवर झाडांची कत्तल करण्यात आली.यावेळी वृक्षतोडीला विरोध झाला असता नव्याने वृक्षारोपण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदाराकडून सांगण्यात आले होते. रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. याला एक-दीड वर्षाचा काळ लोटला. मात्र, वृक्षलागवडीचा थांगपत्ता नाही. वृक्ष नसल्याने या मार्गावरील हिरवेपण हरविले आहे. यापूर्वी महामार्गाच्या रुंदीकरण, मजबुतीकरणाकरिता नागपूर मार्गावरील पवनारपासून पुढे बुटीबोरीपर्यंत हजारावर वृक्षांची तोड करण्यात आली. आता गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट दरम्यानच्या डेरेदार वृक्षांच्या कत्तलीचा घाट संबंधित विभागाकडून घातला जात आहे. पूर्वतयारी म्हणून वृक्षांवर खाचाही करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष खदखदत आहे. विकासकामांत शहरातील अनेक मार्गावरील वृक्षांचा बळी घेण्यात आल्याने शहराचे ‘आरे’ होते की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे....तर चिपको आंदोलनासाठी सज्ज व्हावेमार्गाच्या दुतर्फा असलेले डेरेदार वृक्ष न तोडता हा रस्त्याचे नवनिर्माण होत असेल तर कुणाची काहीच हरकत नाही. मात्र, मोठमोठ्या वृक्षांची कत्तल होणार असेल तर पर्यावरण रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या वर्धेकरांनी आता चिपको आंदोलनासाठीही सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी केले आहे.वृक्षतोडीने ओसाड झालेत हे मार्गविकासकामांत वर्धा ते हिंगणघाट, वर्धा ते यवतमाळ, वर्धा ते नागपूर तसेच वर्धा ते राळेगाव, वर्धा ते आर्वी या मार्गांवरील डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आल्याने ओसाड झाले आहेत. उन्हाळ्यात सावलीचा आधार घेण्यास वृक्ष शोधूनही सापडत नाहीत. जीवघेण्या विकासात पाच ते सात हजारांवर वृक्षांची तोड झाल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तविला आहे.योजनेतील किती रोपे जगली?दरवर्षी नवनव्या योजनांच्या नावाखाली शासनाकून जिल्ह्याला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. यापूर्वी हरितम, शतकोटी तर गतवर्षी ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. जिल्ह्याला वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट होते. काही विभागाने वृक्षलागवड केली; ती जगलीत की जळाली, हा संशोधनाचा विषय असून काही विभागांनी वृक्षलागवड न करता योजनेला हरताळ फासल्याची वस्तुस्थिती आहे. यंत्रणेने आॅडिट करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यातगत पाच वर्षांच्या काळात नियोजनाच्या अभावात सुरू असलेल्या विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. यामुळे शहरातून विविध गावांना जोडणारे मार्ग ओस पडले आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णत: ढासळला असल्याचा अहवाल आहे. विकासकामांकरिता नागपूर मार्गालगतची झाडे तोडण्याची तयारी सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सोमवारी, १८ नोव्हेंबरला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करणार आहेत.अधिकाऱ्यांनी केले खिसे ‘गरम’वर्धा शहरातून चौफेर जाणाऱ्या मार्गालगतच्या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराने कोट्यवधींची माया जमविली. वनविभागाने नाहरकत देण्याकरिता मोठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग