शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस पिकावर 'मर' रोगाचा 'अटॅक'; शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:21 IST

Vardha : जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परिस्थितीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेली असताना अधिक प्रमाणात दिसून येते.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशी पिकाला पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेली जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी शेतकऱ्यांनी आकस्मिक मर रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तजेलदारपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तसेच सुकल्यासारखे दिसते. त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने, फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळी पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बाँडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मुळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडाला हमखास नवीन फूट येते. त्यामुळे या रोगाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. 

कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम अधिक युरिया २०० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रति झाड २५० ते ५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डीएपी २०० ग्रॅम १० लिटर पाण्यात आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

मर रोगाबाबत उपाययोजना...कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकाला प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालीलपैकी आळवणी करावी.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा