आर्वीत सायकल रॅलीने ‘नो व्हेईकल डे’

By Admin | Updated: January 30, 2016 02:29 IST2016-01-30T02:29:08+5:302016-01-30T02:29:08+5:30

आर्वीत दर शुक्रवारी ‘नो व्हेईकल डे’ ला विविध सामाजिक संघटनाकडून वाढता पाठींबा मिळत आहे.

Arvite Cycle Rally 'No Vehicle Day' | आर्वीत सायकल रॅलीने ‘नो व्हेईकल डे’

आर्वीत सायकल रॅलीने ‘नो व्हेईकल डे’

दर शुक्रवारी आर्वीतील एका वॉर्डात करणार जनजागृती
आर्वी : आर्वीत दर शुक्रवारी ‘नो व्हेईकल डे’ ला विविध सामाजिक संघटनाकडून वाढता पाठींबा मिळत आहे. पुढील शुक्रवारपासून आर्वीतील एका वॉर्डात ‘नो व्हेईकल डे’ ची जनजागृती करणार असल्याचा व टप्प्याटप्प्याने या सामाजिक उपक्रमात सामाजिक व राजकीय पक्षांना सहभागी करण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी व आर्वीतील लॉयन्स क्लबच्या पुढाकाराने ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात येणार आहे.
आर्वीत शुक्रवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक विश्रामगृह येथून ‘नो व्हेईकल डे’ जनजागृती रॅली व संदेशाची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, कन्नमवार विद्यालय येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. रिपल राणे, रोटरी क्लबचे अ‍ॅड. व्हि.टी. देशपांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. नंदकिशोर कोल्हे यांनी या सायकल रॅलीत स्वत: सायकल चावलून प्रदूषण विरहित शुक्रवार पाळण्याचा संदेश दिला. या रॅलीसोबत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष व कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरूण पावडे, राजाभाऊ गिरधर, आय.एम.ए. संघटना, मेडिकल असोसिएशन, रोटरी, लॉयन्स क्लब, शिक्षक रेणुका ग्रुप, व विविध समाजिक संघटनांनी या सायकल रॅलीत सहभाग घेतला. ही सायकल रॅली शिवाजी चौक, गांधी चौक मार्गे, वलीसाहेब वॉर्ड, लकडगंज परिसर, इंदिरा मार्केट परिसरातून निघून डॉ. पावडे हॉस्पिटल समोर या रॅलीचा समारोप झाला. समारोप प्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. राणे यांनी भूमिका विषद करून ‘नो व्हेईकल डे’ पाळणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. संचालन प्रा. अभय दर्भे यांनी केले. येत्या शुक्रवारी लॉयन्स क्लबच्या पुढकाराने ‘नो व्हेईकल डे’चा निर्धार केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arvite Cycle Rally 'No Vehicle Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.