शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

खत अन् बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आर्वी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांच्या बियाण्यांचे तब्बल ३ हजार १०१ पॅकेटची मागणी नोंदविली आहे. वर्धा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी २७३, सेलू तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी १४८, देवळी तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांनी ४९, आर्वी तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांनी ४८६, आष्टी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी ४९, कारंजा तालुक्यातील ७१ शेतकऱ्यांनी ४८३, हिंगणघाट तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी १ हजार १७ तर समुद्रपूर तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांनी ५९६ पॅकेट बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण उपक्रमाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद : जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी ३,१०१ पॅकेट बियाण्यांची नोंदविली मागणी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्रांवरील शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या नेतृत्वात बांधावर आणि घरपोच बियाणे व खत पोहोचविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. बांधावर आणि घरपोच बियाणे व खत मिळण्यासाठी मागणी नोंदविण्यात सध्या आर्वी तालुका अव्वल असल्याचे बघावयास मिळत आहे.बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांच्या बियाण्यांचे तब्बल ३ हजार १०१ पॅकेटची मागणी नोंदविली आहे. वर्धा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी २७३, सेलू तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी १४८, देवळी तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांनी ४९, आर्वी तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांनी ४८६, आष्टी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी ४९, कारंजा तालुक्यातील ७१ शेतकऱ्यांनी ४८३, हिंगणघाट तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी १ हजार १७ तर समुद्रपूर तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांनी ५९६ पॅकेट बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. तशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. ऑनलाईन पद्धतीने कृषी विभागाने तयार केलेल्या गुगलपेज व ॲपवर मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत आणि बियाणे वेळीच पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी केंद्रचालकांच्या सहाय्याने विशेष प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात जिल्हा प्रशासनाचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. शिवाय सध्या जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोविड संकटातही कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी नव्या जोमाने माेहिमेच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न क

१७,४३४ क्विंटल बियाण्यांचा झाला पुरवठाn खरीप हंगामात कपाशीचे ४ हजार ५४५ क्विंटल, तुरीचे ५ हजार २९५ क्विंटल, सोयाबीनचे ९२ हजार ६२५ क्विंटल, मकाचे १३८ क्विंटल, ज्वारीचे १६२ क्विंटल, मुगाचे ५८ क्विंटल, उडिदाचे ८५ क्विंटल, तिळाचे १ क्विंटल तर भूईमुगाचे ६७५ क्विंटल बियाण्याची गरज लागणार आहे.  त्यापैकी १७ हजार ४३४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा वर्धा जिल्ह्याला झाला आहे. तर उर्वरित बियाण्यांचा पुरवठा होत आहे.  

प्रत्येक शेतकऱ्याला बांधावर खत आणि बियाणे पोहोचवून देण्यासाठी कृषी विभाग जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची मागणी नोंदवावी, तसेच कुठली अडचण असल्यास थेट माझ्याकडे किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक,     कृषी अधिकारी, वर्धा. 

३५ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत अन् बियाणेऑनलाइन पद्धतीचा वापर करून मागणी नोंदविल्यावर त्या शेतकऱ्यांच्या घरी किंवा बांधावर खत आणि बियाणे वेळीच कसे पोहोचेल यासाठी सध्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न होत आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५ शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणे पोहोचते करण्यात आले. बुधवारीही काही शेतकऱ्यांना खत व बियाणे पोहोचविण्यात आले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती