शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

आर्वी काँग्रेस, हिंगणघाट भाजप तर वर्धा व देवळीत संभ्रम

By admin | Updated: October 16, 2014 23:28 IST

मतदानानंतर चारही विधानसभा क्षेत्रातून कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल. यांचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी रंगत असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चर्चेतील सूर : उमेदवारांच्या भवितव्याबाबत आकडमोड सुरूराजेश भोजेकर -वर्धामतदानानंतर चारही विधानसभा क्षेत्रातून कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडेल. यांचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी रंगत असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चारही मतदार संघात अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्याने नेमका कोणता उमेदवार निवडून येईल. याबाबत बांधल्या अंदाजानुसार आर्वीत काँग्रेस तर काहींच्या आकडे मोडीनुसार भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. देवळीत तिरंगी लढत झाल्याचे अंदाज बांधले जात आहे. यामध्ये भाजप निवडून येणार अशी चर्चा असताना काहींच्या आकडेमोडीनुसार काँग्रेस चवथ्यांदा निवडून येईल. हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपात लढत झाल्याचे बोलले जात असून भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. यातही भाजपला झुकते माप दिले जात आहे. वर्धेत बहुरंगी लढत झाली यामध्ये भाजपला वरचढ स्थान दिले जात आहे. काँग्रेसही बाजी मारू शकते. अशी चर्चा असताना काहीजण राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपाच्या विजयचीही गणिते मांडत आहे. परिवर्तन आणि मोदी लाट चालली तर चारही मतदार संघात कमळ फुलतील, असे चित्र आहे.आर्वीत थेट लढतीत काँग्रेसला संधी आर्वी मतदार संघात काँग्रेसचे अमर काळे आणि भाजपाचे दादाराव केचे यांच्यात काट्याची टक्कर बघायला मिळाली. गेल्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेवून अमर काळे यांनी चुकांवर कटाक्ष ठेवून ही निवडणूक लढली. दुसरीकडे दादाराव केचे अतिविश्वास बाळगून निवडणुकीला सामोरे गेले. काहींच्या मते, ही निवडणूक पक्षाला गौण माणून व्यक्ती भोवती फिरल्यामुळे अमर काळे यांना विजयाची संधी अधिक आहे, तर मोदी लाट चालली तर दादाराव केचे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यातही राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष बाळा जगताप यांनीही चांगलीच मजल मारली होती. मतांचे हे विभाजन काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे आहे, असेही भाकीत वर्तविले जात आहे. एकूण चर्चेचा आधार घेता येथे काँग्रेसचे अमर काळे यांना विजयाची संधी असल्याचा सूर आहे.हिंगणघाट चौरंगी लढतीत भाजपकडे कलहिंगणघाट मतदार संघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, शिवसेनेचे अशोक शिंदे आणि बसपाचे प्रलय तेलंग यांच्यात काट्याची लढत झाली. यामुळे विजयाचा सारीपाट मांडणे अवघड झाले आहे. २००९ च्या निवडणुकीत समीर कुणावार यांची विजयाची संधी अल्पमतांनी हुकली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच निवडून द्यायचे, असे एकूण वातावरण होते. त्यांच्यासोबत राजकीय मंडळींच्या औदासिन्यामुळे दुखावलेला मोठा मतदार गट होता. मात्र युती तुटल्याने त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढल्यामुळे अनेक मतदार त्यांच्यापासून दूर झाले. परिणामी बसपाचे प्रलय तेलंग यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसने उषाकिरण थुटे यांना निवडणुकीत उतरविल्यामुळे निवडणुकीत ‘कास्ट फॅक्टर’ सक्रीय झाला. याचा फटका शिवसेनेला बसतील, अशी चर्चा आहे. यासोबत तरूण वर्गावर मनसेचे अतुल वांदिले यांनी छाप पाडल्यामुळे शिवसेनेचे तरूण मतदार त्यांच्यासोबत गेले. याचाही फटका शिंदे यांना फटका बसला. एकूणच शिवसेना बॅकफूॅटवर आली तरीही शिंदे नेहमीप्रमाणे राजकीय खेळी खेळून मतांचा आकडा कायम ठेवण्यात महावीर ठरले, तर त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. राजू तिमांडे यांना गेल्या निवडणुकीत मतदारांनी डावलले होते. तरीही त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. जनतेच्या समस्यांना घेवून प्रशासन आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबाबत असलेली असुया संपुष्टात आली. त्यात त्यांच्या मतांचे विभाजन होताना दिसले नाही. यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचे दिसून येते. बसपाचे प्रलय तेलंग यांनी प्रचारात कमालीची आघाडी घेतली होती. त्यांनी हिंगणघाटात चांगली मजल मारली असे बोलले जात आहे. ग्रामीण भागात त्यांनी चमत्कार केला तर तेही विजयाच्या जवळ असल्याचे गणित मतदानानंतर मांडणे सुरू झाले आहे. एकूणच चर्चेचा सूर बघता परिवर्तनाच्या लाटेवर भाजपाचे समीर कुणावार यांच्या विजयाची आशा वाढली आहे.