शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

भरपावसाळ्यात शहरालगतच्या भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनळावर लावले जातात मोटारपंप : सुशिक्षितांचे बेकायदेशीर कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या आलोडी, साटोडा, नालवाडी, पिपरी (मेघे) यासह अन्य भागात नळावर सर्रास मोटारपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभर पाणी मिळेनासे झाले आहे. पर्यायाने कृत्रिम पाणीटंचाई या भागात निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने नागरिकांच्या बेकायदेशीर कृत्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना हंडाभरदेखील पाणी मिळत नाही. मागील चार दिवसांपासून आलोडी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होता. रविवारी सकाळी नळ आल्यानंतर अनेकांनी लगेच मोटारपंप लावून वारेमाप पाणीउपसा सुरू केला. यात अयोध्यानगर परिसरातील अनेकांना पिण्याच्या पाण्याविनाच राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संवेदनाहिन नागरिकांप्रति प्रचंड संताप व्यक्त केला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने धडक तपासणी मोहीम राबवून नळावर बेकायदेशीररीत्या मोटारपंप लावून पाणी उपसा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याची मागणी आलोडीतील नागरिकांनी केली आहे.जलवाहिनी नव्याने टाकण्याची मागणीनळयोजनेद्वारा पाणीपुरवठ्याकरिता कंत्राटदाराने जीआयऐवजी पीव्हीसी जलवाहिनी अंथरली आहे. आलोडी, साटोडा भागातून बांधकाम साहित्याची रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. वाहनांच्या दाबामुळे जलवाहिनीला सातत्याने गळती लागले. मात्र, दुरुस्तीला बऱ्याचदा विलंब होत असल्याने पाणीपुरवठा ठप्् होतो. याकरिता पाणीपुरवठ्याकरिता नव्याने जलवाहिनी अंथरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नळ सोडण्याच्या वेळाच नाहीतआलोडी, साटोडा या भागात बºयाचदा सकाळी सहा वाजता, कधी आठ वाजता तर कधी १० आणि दुपारी १२ वाजता नळ सोडले जातात. त्यातही अल्प काळ पुरवठा सुरू असतो. नळाच्या ठरावीक वेळा नसल्यानेही अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नळ सोडण्याच्या वेळा निश्चित कराव्या, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई