शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

भरपावसाळ्यात शहरालगतच्या भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनळावर लावले जातात मोटारपंप : सुशिक्षितांचे बेकायदेशीर कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या आलोडी, साटोडा, नालवाडी, पिपरी (मेघे) यासह अन्य भागात नळावर सर्रास मोटारपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभर पाणी मिळेनासे झाले आहे. पर्यायाने कृत्रिम पाणीटंचाई या भागात निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने नागरिकांच्या बेकायदेशीर कृत्याला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरालगतच्या अकरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणीपुरवठ्याकरिता पीव्हीसी जलवाहिनी टाकण्यात आल्याने अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागते. परिणामी, पाणीपुरवठा ठप्प होतो. दर्जाहीन जलवाहिनीमुळे काही भागात अतिदाबाने तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे एक हंडा भरण्यास चक्क दहा मिनिटे लागतात. त्यातच नागरिकांकडून नळावर मोटारपंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना हंडाभरदेखील पाणी मिळत नाही. मागील चार दिवसांपासून आलोडी परिसरातील पाणीपुरवठा ठप्प होता. रविवारी सकाळी नळ आल्यानंतर अनेकांनी लगेच मोटारपंप लावून वारेमाप पाणीउपसा सुरू केला. यात अयोध्यानगर परिसरातील अनेकांना पिण्याच्या पाण्याविनाच राहावे लागले. त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संवेदनाहिन नागरिकांप्रति प्रचंड संताप व्यक्त केला. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने धडक तपासणी मोहीम राबवून नळावर बेकायदेशीररीत्या मोटारपंप लावून पाणी उपसा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याची मागणी आलोडीतील नागरिकांनी केली आहे.जलवाहिनी नव्याने टाकण्याची मागणीनळयोजनेद्वारा पाणीपुरवठ्याकरिता कंत्राटदाराने जीआयऐवजी पीव्हीसी जलवाहिनी अंथरली आहे. आलोडी, साटोडा भागातून बांधकाम साहित्याची रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. वाहनांच्या दाबामुळे जलवाहिनीला सातत्याने गळती लागले. मात्र, दुरुस्तीला बऱ्याचदा विलंब होत असल्याने पाणीपुरवठा ठप्् होतो. याकरिता पाणीपुरवठ्याकरिता नव्याने जलवाहिनी अंथरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नळ सोडण्याच्या वेळाच नाहीतआलोडी, साटोडा या भागात बºयाचदा सकाळी सहा वाजता, कधी आठ वाजता तर कधी १० आणि दुपारी १२ वाजता नळ सोडले जातात. त्यातही अल्प काळ पुरवठा सुरू असतो. नळाच्या ठरावीक वेळा नसल्यानेही अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नळ सोडण्याच्या वेळा निश्चित कराव्या, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई