शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:51 IST

Wardha : कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी

वर्धा : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असताना लहान मुली विकृतांच्या वासनेच्या बळी पडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे सर्व गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी वारंवार होत आहे. शहरातदेखील वारंवार विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, परिचयातील व्यक्तींकडून गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, विनयभंगासह अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये ५४ गुन्ह्यांची नोंद झाली. याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे ५० वर गुन्हे दाखल झाले.

९५ टक्के गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास पूर्ण अल्पवयीनांसोबत झालेल्या गैरप्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन आरोपींना अटक झाली आहे. अशा गुन्ह्यांत महिला अधिकारी व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसमोर जबाब नोंदवून प्रक्रिया पार पाडावी लागते.

७० टक्के परिचितच अल्पवयीन मुली, मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ७० टक्के आरोपी हे परिचयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे.

सोशल मीडिया ठरतेय कारणीभूत... महिला व मुलींवर अत्याचार होण्यात बऱ्याच प्रमाणात सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा व मुलगी जवळ येतात. याची भनक पालकांना लागत नाही. अल्पवयीन मुलींना फारशी समज राहत नसल्याने त्या मुलांकडून टाकण्यात आलेल्या बनावट प्रेमाच्या पाशात अडकतात. त्यानंतर प्रेमाच्या आड शारीरिक शोषण केले जाते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आठ दिवसांतून एकदा घडते. काही पालक तर पोलिसात तक्रार देण्यासही जात नसल्याचे दिसून आले आहे. यातून या प्रकारांना आणखीच बळ मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा