शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:51 IST

Wardha : कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी

वर्धा : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असताना लहान मुली विकृतांच्या वासनेच्या बळी पडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे सर्व गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी वारंवार होत आहे. शहरातदेखील वारंवार विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, परिचयातील व्यक्तींकडून गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, विनयभंगासह अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये ५४ गुन्ह्यांची नोंद झाली. याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे ५० वर गुन्हे दाखल झाले.

९५ टक्के गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास पूर्ण अल्पवयीनांसोबत झालेल्या गैरप्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन आरोपींना अटक झाली आहे. अशा गुन्ह्यांत महिला अधिकारी व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसमोर जबाब नोंदवून प्रक्रिया पार पाडावी लागते.

७० टक्के परिचितच अल्पवयीन मुली, मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ७० टक्के आरोपी हे परिचयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे.

सोशल मीडिया ठरतेय कारणीभूत... महिला व मुलींवर अत्याचार होण्यात बऱ्याच प्रमाणात सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा व मुलगी जवळ येतात. याची भनक पालकांना लागत नाही. अल्पवयीन मुलींना फारशी समज राहत नसल्याने त्या मुलांकडून टाकण्यात आलेल्या बनावट प्रेमाच्या पाशात अडकतात. त्यानंतर प्रेमाच्या आड शारीरिक शोषण केले जाते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आठ दिवसांतून एकदा घडते. काही पालक तर पोलिसात तक्रार देण्यासही जात नसल्याचे दिसून आले आहे. यातून या प्रकारांना आणखीच बळ मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा