शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

विमा कंपन्यांच्या मनमानीला बसणार आता चाप; नुकसानीच्या प्रस्तावासाठी असणार सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

पाऊस कमी झाला की पिकांचे उत्पादन कमी होत असते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना अंमलात आणली होती, पण या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नव्हता. यातील जाचक अटींमुळे बरेच लाभार्थी शेतकरी वंचित राहत होते. कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे सांगण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईलवर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे विमा कंपन्याच्या मनमानीला ब्रेक लागणार व शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवित असतो, परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. पाऊस कमी झाला की पिकांचे उत्पादन कमी होत असते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना अंमलात आणली होती, पण या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नव्हता. यातील जाचक अटींमुळे बरेच लाभार्थी शेतकरी वंचित राहत होते. कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहज घेता, यावा यासाठी ही जाचक अट वगळण्यात आली आहे.

आधी काय होते दोन पर्याय

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्या पासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक राहील.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्या पासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक राहील.

हे आहेत नवीन पर्यायnक्रॉप इन्शुरन्स ॲपबरोबरच आता नुकसानग्रस्त शेतकरी, या नवीन पर्यायानुसार माहिती देऊ शकतील विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, त्यांचा ई-मेल, त्यांचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला. त्या बँकेची नजीकची शाखा या ठिकाणीही शेतकरी आता त्यांच्या शेतीची नुकसानीची सूचना नोंदवू शकेल.

दहा कोटींचे नुकसान- देवळी, आर्वी, सेलू या तीन तालुक्यांत अतिवृष्टीची कृषी विभागाकडून नोंद घेण्यात आली. शेतकऱ्यांचे कोटींचे नुकसान झाले. यंत्रणा पंचनामे करतात. सादरही करतात, तरीही शेतकरी लाभापासून वंचितच राहतो.

 

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा