शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:39 IST

कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटरपंपाचा भार : नारा- २२ व कारंजा येथील पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. हा उपसा असाच सुरु राहिला तर फेब्रुवारी व मार्च महिन्यातच कारंजावासींयांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कारंजाचा समावेश असल्याने संभावीत पाणी टंचाई लक्षात घेता ३० आॅक्टोबरला संबंधित विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला जलाशयाचे अधिकारी, तहसीलदार व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या जलाशयावर ५० हून अधिक मोटरपंप अनधिकृतरित्या सूरू असून त्यांच्यावर कारवाईकरीत ते बंद केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. पण, अधिकाऱ्यांची ही आश्वासने कु ठे गडप झाली हे कळायला मार्ग नाही.पाणी कमी असताना धरणाच्या पश्चिमेकडील कालवा खुला करुन पाणी सोडण्यात आले. जी गावे प्रत्यक्ष धरणात गेली त्या खैरी व इतर गावांना हिवाळी पीकांची लागवड करु नका. पाणी दिल्या जाणार नाही असे सांगण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन संकट लक्षात घेता, येथील काही गावांनी हिवाळी पिकांची लागवड केली नाहीत. पण इतर दूरच्या गावांना मात्र कालव्याव्दारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रताप, संबंधित अधिकाºयांनी केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.कालव्याचे पाणी सोडल्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाºया नारा-२२ गावाची पाणीपुरवठा योजना आणि कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना मार्चमध्ये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या कालव्याव्दारे पाणी सोडल्या गेले तो कालवा फुटल्याने पाणी इतरत्र पसरुन वाया जात आहे. दुष्काळी परिस्थिती हा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे.जलाशय ठरले शेतकऱ्यांसाठी वरदानयेथील खैरी धरण माती व सिमेंटचे असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र १७६.१२ चौ.मी.मीटर आहे. धरणाची उंची २५.११ मीटर असून लांबी ८२७ मीटर आहे. तसेच पाणी साठवणूक क्षमता २६ दशलक्ष घनमीटर असून यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरले नाही. नेहमी ओव्हर फ्लो होणारे धरण यावर्षी केवळ ६० टक्केच भरले. या धरणामुळे आष्टी तालुक्याच्या १४ गावांतील ३ हजार ६९० हेक्टर व कारंजा तालुक्याच्या १३ गावांतील १ हजार ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणले. सध्या २६ टक्केच जलसाठा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई