शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:39 IST

कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटरपंपाचा भार : नारा- २२ व कारंजा येथील पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. हा उपसा असाच सुरु राहिला तर फेब्रुवारी व मार्च महिन्यातच कारंजावासींयांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कारंजाचा समावेश असल्याने संभावीत पाणी टंचाई लक्षात घेता ३० आॅक्टोबरला संबंधित विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला जलाशयाचे अधिकारी, तहसीलदार व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या जलाशयावर ५० हून अधिक मोटरपंप अनधिकृतरित्या सूरू असून त्यांच्यावर कारवाईकरीत ते बंद केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. पण, अधिकाऱ्यांची ही आश्वासने कु ठे गडप झाली हे कळायला मार्ग नाही.पाणी कमी असताना धरणाच्या पश्चिमेकडील कालवा खुला करुन पाणी सोडण्यात आले. जी गावे प्रत्यक्ष धरणात गेली त्या खैरी व इतर गावांना हिवाळी पीकांची लागवड करु नका. पाणी दिल्या जाणार नाही असे सांगण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन संकट लक्षात घेता, येथील काही गावांनी हिवाळी पिकांची लागवड केली नाहीत. पण इतर दूरच्या गावांना मात्र कालव्याव्दारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रताप, संबंधित अधिकाºयांनी केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.कालव्याचे पाणी सोडल्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाºया नारा-२२ गावाची पाणीपुरवठा योजना आणि कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना मार्चमध्ये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या कालव्याव्दारे पाणी सोडल्या गेले तो कालवा फुटल्याने पाणी इतरत्र पसरुन वाया जात आहे. दुष्काळी परिस्थिती हा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे.जलाशय ठरले शेतकऱ्यांसाठी वरदानयेथील खैरी धरण माती व सिमेंटचे असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र १७६.१२ चौ.मी.मीटर आहे. धरणाची उंची २५.११ मीटर असून लांबी ८२७ मीटर आहे. तसेच पाणी साठवणूक क्षमता २६ दशलक्ष घनमीटर असून यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरले नाही. नेहमी ओव्हर फ्लो होणारे धरण यावर्षी केवळ ६० टक्केच भरले. या धरणामुळे आष्टी तालुक्याच्या १४ गावांतील ३ हजार ६९० हेक्टर व कारंजा तालुक्याच्या १३ गावांतील १ हजार ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणले. सध्या २६ टक्केच जलसाठा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई