शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:39 IST

कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटरपंपाचा भार : नारा- २२ व कारंजा येथील पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. हा उपसा असाच सुरु राहिला तर फेब्रुवारी व मार्च महिन्यातच कारंजावासींयांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कारंजाचा समावेश असल्याने संभावीत पाणी टंचाई लक्षात घेता ३० आॅक्टोबरला संबंधित विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला जलाशयाचे अधिकारी, तहसीलदार व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या जलाशयावर ५० हून अधिक मोटरपंप अनधिकृतरित्या सूरू असून त्यांच्यावर कारवाईकरीत ते बंद केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. पण, अधिकाऱ्यांची ही आश्वासने कु ठे गडप झाली हे कळायला मार्ग नाही.पाणी कमी असताना धरणाच्या पश्चिमेकडील कालवा खुला करुन पाणी सोडण्यात आले. जी गावे प्रत्यक्ष धरणात गेली त्या खैरी व इतर गावांना हिवाळी पीकांची लागवड करु नका. पाणी दिल्या जाणार नाही असे सांगण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन संकट लक्षात घेता, येथील काही गावांनी हिवाळी पिकांची लागवड केली नाहीत. पण इतर दूरच्या गावांना मात्र कालव्याव्दारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रताप, संबंधित अधिकाºयांनी केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.कालव्याचे पाणी सोडल्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाºया नारा-२२ गावाची पाणीपुरवठा योजना आणि कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना मार्चमध्ये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या कालव्याव्दारे पाणी सोडल्या गेले तो कालवा फुटल्याने पाणी इतरत्र पसरुन वाया जात आहे. दुष्काळी परिस्थिती हा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे.जलाशय ठरले शेतकऱ्यांसाठी वरदानयेथील खैरी धरण माती व सिमेंटचे असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र १७६.१२ चौ.मी.मीटर आहे. धरणाची उंची २५.११ मीटर असून लांबी ८२७ मीटर आहे. तसेच पाणी साठवणूक क्षमता २६ दशलक्ष घनमीटर असून यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरले नाही. नेहमी ओव्हर फ्लो होणारे धरण यावर्षी केवळ ६० टक्केच भरले. या धरणामुळे आष्टी तालुक्याच्या १४ गावांतील ३ हजार ६९० हेक्टर व कारंजा तालुक्याच्या १३ गावांतील १ हजार ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणले. सध्या २६ टक्केच जलसाठा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई