शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवास योजना लागू करा

By admin | Updated: December 13, 2015 02:15 IST

शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते.

विद्यार्थिनींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर वर्धा : शहराच्या ठिकाणी शिकण्याकरिता पैसे नसल्याने अनेकदा मुलींना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मोफत प्रवास योजना लागू करावी, अशी मागणी महिला आश्रम अध्यापक विद्यालय व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनाद्वारे केली.प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाकरिता मुलींना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास योजना शासनाने लागू केली आहे. असे असले तरी त्यापुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता मुलींना मोफत प्रवासाची कोणतीही तरतूद शासनाने केली नाही. शहराच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील मुलींकडे जाण्या-येण्याकरिता लागणाऱ्या प्रवासखर्चाची सोय नाही. त्यामुळे त्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकत नाही. शिकण्याची तीव्र इच्छा असतानादेखील मुलींना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागते. यात अनेक प्रज्ञावंत विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे स्वाती अभय योजना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लागू व्हावी तसेच पदवीपर्यंतचा प्रवास खर्च शासनाकडून मोफत असावा, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी महिला आश्रमच्या प्रा. सुचिता राऊत, प्रा. रिना परतेती, प्रा. साधना मेंढे, प्रा. माधुरी देशमुख, छात्राध्यापक स्रेहलता जांभूळकर, कीर्ती बालपांडे, लीना पाटील, माहेश्वर करलुके, मयुरी पाळेकर, प्रगती तेलरांधे, ममता भटेरा, वैशाली देशमुख, प्राजक्ता शेंडे, वृषाली मानकर, वृंदा ठाकरे, रक्षदा मून, मनीषा कुर्जेकर, शबनम शेख आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)