शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतीविषयक कार्य व कृषीसंबाधित उद्योग करण्याकरिता परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 8:20 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्देखासदार रामदास तडस यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली.जिल्हयात कोरोणा विषाणूच्या प्रादुभार्वास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण जिल्हयात संचार बंदी करण्यात आलेली आहे. परंतु जिल्हयातील शेतक-यांचा कापुस, हरभरा, गहु, तूर, संत्रा इत्यादी शेतमाल काढावयाचा असल्यामुळे अनेक अडचणी येत आहे, शेतक-यांना शेतामध्ये काम करण्याकरिता मजुर मिळत नसल्यामुळे तसेच पावसाळी वातावरणामुळे अनेक पिकाचे नुकसान होऊ शकते या करिता आपण शेतक-यांना शेतमाल काढण्याची परवानगी देण्यात यावी, त्यांची अडवणूक करुन त्रास देवू नये. तसेच कृषी आधारीत उद्योग धंदे बंद करण्यात आलेले आहे. याकरिता आपण कृषी आधारित उद्योग धंदे जसे जिनिंग अ‍ॅन्ड पे्रसींग मध्ये कापुस प्रक्रिया व त्यापासून निघणारी सरकी, तेल व्यवासाय, जिंनिंग व कृषी उद्योगा मध्ये दिवसपाळी व रात्रपाळी कामकरणारे, कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणा-या कंपन्या दालमिल, आॅइलमील, गहु, कारखाने उद्योग व्यवसाय करणार यांच्यावर सुध्दा कोणतही कार्यवाही करु नये तसेच या संबधीत आपल्या अधिनस्त आदेश काढून सर्वांना कळवावे अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.वर्धा शहरात भाजी विक्रेत्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व तुकडोजी ग्राउंड येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. परतु एकाच ठिकाणी असल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढू शकते याकरिता प्रत्येक वार्डामध्ये भाजीपाल्याची व्यवस्था करुन देण्यात यावी जेणेकरुन गर्दीचे प्रमाण कमी होऊ शकेल. वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थी व नोकरदारवर्ग जिल्हाबाहेर, अनेक राज्यात आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु संपुर्ण संचारबंदी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहे त्यांना जिल्हयात आणण्याकरिता किंवा तिथेच त्या सर्व व्यवस्था करण्याकरिता तेथील संबधीत जिल्हयाधिकारी सोबत संपर्क साधून व्यवस्था करण्याबाबतसुध्दा सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी दिल्या.वर्धा जिल्हात जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव नियत्रणात आणण्याखाली प्रभावी कार्य सुरु आहे. आपल्या जिल्हयात कोरोना ग्रस्त रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन जिल्हयात कोरोना वायरस प्रादुर्भाव थांबविण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहे. सर्व नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत मध्ये सर्व परीसर स्वच्छ राखत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाला सहकार्य करा, प्रशासनाच्या सुचनाचे पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस