शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् आता ‘अ‍ॅव्हरेज’ ही घटला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अ‍ॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : व्यवसायही ठप्प, आहे त्या परिस्थितीत दे धक्का!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माणसाचे जीवन चक्राप्रमाणे गतिमान झाले असून या धावपळीत वाहनांचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे माणसांच्या आरोग्यासोबतच वाहनांचेही आरोग्य जपण्यासाठी त्यांची नियमित सर्व्हिसिंग होणे आवश्यक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व दुकाने बंद असल्याने सध्या वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् ‘अ‍ॅव्हरेज’ ही घटला आहे. पण, पर्याय नसल्याने आहे त्याच परिस्थितीत वाहन चालकांचा दे धक्का सुरु आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमध्ये जिल्ह्यात १५ मे पासून लॉकडाऊन करण्यात आला. सुरुवातीला अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने तेव्हापासून दुचाकी व चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर आणि चारचाकी वाहनांचे अलायमेंट व बॅलंसिंग सेंटर बंद करावे लागले. सध्या लॉकडॉऊन असल्यामुळे टॅक्सीचाही व्यवसाय अडचणीत आल्याने बºयाच वाहनचालकांनी आपली वाहने शासकीय कामात लावली आहे. तर काहींची वाहने अद्यापही अत्यावश्यक सुविधांच्या नावाने रस्त्यांवर धावतांना दिसत आहे. वाहने धावत असल्याने त्यांच्यामधील ऑईल नियमित बदलवून वाहनांची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. यासोबतच चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अ‍ॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.

ना पंक्चर दुरुस्तीचे सोय, ना हवा भरण्याचीn‘घरात रहा...सुरक्षित रहा...’ असे आवाहन करुन शासनाने लॉकडाऊन केला आहे. पण, अत्यावश्यक सुविधा तसेच इतर महत्वांच्या कामाकरिता नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने वाहनांची आवश्यक पडत आहे. परंतु सध्या ना पंक्चर दुरुस्तीची सोय आहे ना हवा भरण्याची. त्यामुळे काहींनी वाहने उभी करुन सायकलीचा आधार घेत आहे तर काही कमी हवेतही वाहने दामटविताना दिसत आहे. ही बाब मात्र खऱ्या अर्थाने चारचाकी वाहनांकरिता फार अडचणीची ठरत आहे. 

वाहनचालकांसमोर अडचणी- सर्व्हिसिंगअभावी अ‍ॅव्हरेज घटला- वाहने खिळखिळी झाली- पंक्चर दुरुस्तीची कोणतीही सोय नाही- अलायमेंटअभावी टायरवर परिणाम- ऑईल बदलेले नसल्याने इंजिनला नुकसान- वाहनांचे कोणतेही पार्ट मिळणे नाहीच

माझे अलायमेंट आणि बॅलंन्सिंगचे काम असून पूर्वी दरदिवसाला दहा ते पंधरा वाहने यायची. दर पाच हजा किलोमीटर वाहन चालल्यानंतर अलायमेंट व बॅलंन्सिंग करणे आवश्यक असते. अन्यथा वाहनाचे टायर मार खातात.पण, आता सर्वच बंद असल्याने अलायमेंट व बॅलंसिंग करता येत नाही. परिणामी वाहनाचालकाला त्याचा फटका बसणार आहे. सोबतच आमची दुकाने बंद असल्याने आमच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. माणिकचंद बारई, व्यावसायिक 

वाहनाचे नियमित अलायमेंट, बॅलंन्सिंग आणि सर्व्हिसिंग केले तर वाहनांचा अ‍ॅव्हरेजही चांगला असतो. त्यामुळे  वाहनचालवितांनाही काही अडचण जात नाही. पण, आता सर्वच बंद असल्याने वाहनांची सर्व्हिसिंग थांबले आहे. परिणामी अ‍ॅव्हरेजही घटला आहे. वाहन चालूच राहिले तर वाहनांच्या आयुर्मानावर परिणाम होईल आणि बंद ठेवले तर रोजीरोटीचा प्रश्न आहे.सुुहास वानखेडे, वाहन मालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या