शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सारस्वतांच्या महाकुंभमेळ्याला आचारसंहितेचा अडसर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 11:06 IST

लोकप्रतिनिधींचा निधी थांबला : नेत्यांच्या छायाचित्रांवरही आली बंधने

आनंद इंगोले

वर्धा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनाकडून निधी मिळत असल्याने एकप्रकारे तो मातृभाषेच्या नावे शासकीय उत्सवच असतो. या संमेलनातून सत्ताधारीही प्रसिद्धी मिळविण्याची कोणतीच संधी दवडत नाहीत. परंतु, वर्ध्यातील हे तीन दिवसीय संमेलन शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात असल्याने या महोत्सवातून नेत्यांच्या छायाचित्रांना परिणामी प्रसिद्धीलाही ब्रेक लागल्याने काहींचा हिरमोड होणार आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तब्बल ५३ वर्षांनंतर वर्ध्याच्या या ऐतिहासिक भूमीला ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला. त्यामुळे हे संमेलनही ऐतिहासिक करण्याकरिता जिल्हा प्रशासन, आयोजन समिती आणि वर्धेकर जोमात कामाला लागले आहेत. येत्या ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या सारस्वतांच्या महाकुंभ मेळ्याला राजकीय मंडळींसह साहित्यिक, लेखक, कलाकार यांच्यासह असंख्य व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. या संमेलनाकरिता शासनाकडून ५० लाखांचा निधी मिळत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, सीएसआर फंड यासह इतर माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. मात्र जिल्ह्यात सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असून, या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निधीला ब्रेक लागला आहे. आता नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांच्या फलकांवरही बंधने आली आहेत. त्यामुळे संमेलनस्थळी आणि स्वागतव्दारावरही नेत्यांच्या छायाचित्रांना स्थान नाही.

लोकप्रतिनिधी देणार ५५ लाखांचा निधी

या संमेलनाकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही तब्बल ५५ लाखांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम देण्याकरिता जिल्हा नियोजन विभागाकडे पत्र दिली आहेत. परंतु, एकाच कामाकरिता इतका निधी वापरण्याकरिता विशेष बाब म्हणून शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते. विशेषत: शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता असल्याने यात अडचण आहे. पण, संमेलनाचे महत्त्व लक्षात घेता मंजुरी देण्याची विनंती शासनाकडे केल्याची माहिती आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या तयारीत शासन, प्रशासन, आयोजक आणि वर्धेकरांचा मोठा सहभाग असून, सर्व एकदिलाने काम करीत आहेत. शासनाकडूनही नुकतीच ५० लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, येत्या दोन-तीन दिवसात निधी प्राप्त होईल. त्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींचाही निधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. संमेलनाची तयारी करताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

- प्रदीप दाते, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता शासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतरही ठिकाणाहून निधी उपलब्ध होत असतो. वर्ध्याच्या या ऐतिहासिक भूमीतील संमेलन ऐतिहासिक ठरावे, याकरिता तयारी सुरू आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होईलच, परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही पत्र प्राप्त झाले असून, त्याच्या मंजुरीकरिता शासनाकडे विनंती केली आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ