शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिना लोटूनही जलाशयात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:16 IST

मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : अकरा जलाशयात केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. परंतु, पावसाळ्याचा एक महिना लोटूनही दमदार पाऊस अजूनही जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे जलाशयांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नसून पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास विदारक परिस्थितीलाच वर्ध्याकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्राप्त माहितीनुसार, सध्यास्थितीत बोर प्रकल्पात १०.२६ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ४.०५ टक्के, पोथरा प्रकल्पात २२.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १३.६४ टक्के, लाल नाला प्रकल्पात ४४.४९ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्पात ३३.३३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर वर्धा शहरासह शहराशेजारील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम, मदन उन्नई धरण, मदन प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प तर पुलगावकरांसाठी फायद्याचा ठरणाºया पंचधारा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठाच संपला असून या पाचही जलाशयाची पाणी पातळी सध्या मृत जलसाठ्यावर आली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी वर्धा जिल्ह्यातील याच अकरा जलाशयांत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल २८.५६ टक्के उपयुक्त जलसाठा होता; पण सध्यास्थितीत याच अकरा जलाशयांत केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे वास्तव आहे. येत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांची भटकंतीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात १८.१५ टक्के पाऊसयेत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु, मागील एक महिन्याचा विचार केल्यास आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात केवळ १८.१५ टक्केच पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेले पर्जन्यमान कमी असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात आतापर्यंत ११५.३० मि.मी., सेलू २०४.०० मि.मी., देवळी १५४.८० मि.मी., हिंगणघाट १८८.६७ मि.मी., समुद्रपूर १९६.३४ मि.मी., आर्वी १३१.८० मि.मी., आष्टी (श.) १७३.२४ मि.मी. आणि कारंजा (घा.) तालुक्यात १७२.८१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.दमदार पाऊस येत्या काही दिवसात न झाल्यास भीषण जलसंकटाला वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अनेकजण ‘दमदार पाऊस येऊ दे गा देवा’ असे ईश्वरचरणी साकडे घालताना दिसून येतात. एकूणच दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई