शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

लोकसभेनंतर भाजपचा जनाधार ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:00 AM

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले होते. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट मतदारसंघातून भाजपला बहुमत मिळाले होते. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाल्याने वर्धा आणि हिंगणघाटमध्ये भाजप, तर देवळी आणि पुलगावात काँग्रेसचे आमदार निवडून आले.

ठळक मुद्देविधानसभेत काँग्रेसला मताधिक्य । हिंगणघाट मतदार संघ ठरला अपवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोदी लाटेवर स्वार होऊन मतदारांनी केंद्रात आणि राज्यातही भाजपला एकहाती सत्ता दिली. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलले. त्यामुळे विधानसभेतही भाजपचे मताधिक्य कायम राहण्याची शक्यता होती; परंतु सहा महिन्यांतच मताधिक्य तब्बल ७२ हजार ९४४ मतांनी घटल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले होते. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट मतदारसंघातून भाजपला बहुमत मिळाले होते. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाल्याने वर्धा आणि हिंगणघाटमध्ये भाजप, तर देवळी आणि पुलगावात काँग्रेसचे आमदार निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चारही मतदारसंघांतून ३ लाख ७४ हजार ५६९ मते तर काँग्रेसला केवळ २ लाख ५५ हजार ९९७ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपला लोकसभेत मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची अपेक्षा होती. त्यामुळे वरिष्ठांनी कंबर कसली होती. मात्र, मतदारांनी यावर्षी भाजपचे तीन आमदार निवडून दिले असले तरी मताधिक्यात ७२ हजार ९४४ मतांनी घसरण झाली आहे. ही घसरण मात्र हिंगणघाट मतदारसंघात बऱ्यापैकी रोखून धरण्यात यश आल्याचे दिसून येत आहे.स्थानिक प्रश्न, उमेदवारांप्रति असलेली लोकभावना तसेच भाजप पक्षांतर्गत वर्ध्यातील कलह या सर्व बाबींमुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार घसरला, हे मतदानानंतर दिसून येत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा या निवडणुकीत वर्धा वगळता देवळी व आर्वी मतदारसंघात दिसून आली. आर्वी येथे राहुल गांधींच्या सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय नियोजनबद्ध प्रचाराची साक्ष देणारा होता. तर देवळीत गेल्या पाच निवडणुकांपासून लढणारे उमेदवार यांना कुठे पेरणी केल्यावर मताचे पीक उगवणार आहे, याचे ज्ञान असल्याने त्यांचा मताधार वाढण्यास मदत झाली. या निवडणुकीत पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला वर्धा मतदारसंघात ७१ हजारांवर मतांचा पल्ला गाठता आला असला तरी काँग्रेसचा परंपरागत गड असलेल्या सेलू तालुक्यातील खड्डे बुजविण्यात भाजप उमेदवार यशस्वी झाले, हेही महत्त्वाचे आहे. भाजप तालुका ध्यक्षाने घोराडच्या सभेत शेतकºयाची कॉलर पकडल्यानंतर येथील मतदान भाजपला होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र घोराडच्याही अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसच्या बरोबरीत चालला. यामागचे कारण मतदारांनाही संभ्रमात टाकणारे आहे. भाजपचा जनाधार घसरण्यामागे विकासाचे शहरवासीयांना अति झालेले अजिर्ण व त्यातून नाराज झालेले लोक यांनीही भाजपविरोधात मतदान केले. हे कारण काँग्रेसचा जनाधार वाढविणारे ठरले.देवळीत सेना व अपक्ष काँग्रेसच्या मताधिक्याजवळचदेवळी मतदार संघात काँग्रेस उमेदवाराने ७१ हजारांवर मत मिळविली. या मतदार संघात भाजपचे बंडखोर राजेश बकाणे यांनी ३९ हजार तर सेनेचे समीर देशमुख यांनी ३० हजार मते घेतली. या दोघांसोबतही सेना व भाजपचे पदाधिकारी लागून होते. या दोघांच्याही मताधिक्क्याचा विचार केला तर ६९ हजारांच्या घरात आहे. याचा अर्थ या मतदार संघात लोकसभेच्या मताधिक्यापर्यंत युुती पोहोचली, असाच होतो.भाजपच्या मताचा काँग्रेससह अपक्षाला फायदालोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य ७२ हजार ९४४ मतांनी घटले. त्यापैकी काँग्रेसच्या वाट्याला १९ हजार १०८ मते आली असून इतर ५३ हजार ८३६ मते ही अपक्ष उमेदवारांसह इतर उमदेवारांच्या पारड्यात पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचाही सूर आळविला जात आहे.बंडखोरी आणि अपूर्ण आश्वासनांचा फटकाजिल्ह्यातील चार मतदार संघांपैकी आर्वी, वर्धा व हिंगणघाट मतदार संघ हा भाजप तर देवळी मतदार संघ शिवसेनेला गेला. त्यामुळे या मतदार संघात भाजपच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. परिणामी , लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य चांगलेच घटले.हिंगणघाट मतदार संघातही काही प्रमाणात भाजपचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. हा मतदार संघ भाजपकरिता असल्याने शिवसेनेच्या उपनेत्यांनी बंडखोरी केली होती. त्याचा काहीसा परिणाम येथे दिसून आला.भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन गेल्या पाच वर्षांत पूर्ण केले नाही. महागाईच्या झळा, वाढती बेरोजगारी आदींचा प्रभावही यावर पडल्याचे दिसून येत आहे.